शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

बँकांच्या रांगेत 36 नागरिक शहीद - गुलाम नबी आझाद

By admin | Updated: November 17, 2016 18:23 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची तुलना उरी हल्ल्यातील शहिदांशी केली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची तुलना उरी हल्ल्यातील शहिदांशी केली आहे. राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांच्या अनुपस्थितीत जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळे आज राज्यसभेचं कामकाजही उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत हजर झाल्यावर आम्ही गोंधळ न घालता कामकाज सुरळीत पार पाडू, असंही आझाद म्हणाले आहेत. यावेळी गुलाम नबी आझाद यांनी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांना लक्ष्य करत भाजपावर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, नोटाबंदीसारख्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे लोकांचा जीव जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे आतापर्यंत उरी हल्ल्यातील शहिदांपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी उरी हल्ल्यात भारतीय जवानांना मारलं नसेल. किंबहुना त्यापेक्षाही जास्त लोक केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे शहीद झाले आहेत. आझाद यांच्या वक्तव्यावर व्यंकय्या नायडूंनी आक्षेप घेतला आहे. आझाद यांनी शहिदांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असा पलटवार करत नायडूंनी आझाद यांच्यावर टीका केली आहे.