शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:15 IST

परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित बाबी नियंत्रित करणारा तसेच बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्यांवर कठोर शिक्षा ठोठावणारा नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ सोमवारी देशभर लागू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित बाबी नियंत्रित करणारा तसेच बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्यांवर कठोर शिक्षा ठोठावणारा नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ सोमवारी देशभर लागू झाला. हा कायदा संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंजूर झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी त्यास मंजुरी दिली होती.

गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव नितेश कुमार व्यास यांच्या अधिसूचनेनुसार, “स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ (कलम १३, २०२५) च्या कलम १ (२) नुसार केंद्र सरकार १ सप्टेंबर २०२५ हा दिनांक या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यासाठी निश्चित करते.”

परदेशी वारंवार येणाऱ्या ठिकाणांवर ठेवणार लक्ष याआधी या विषयांवर चार वेगवेगळ्या कायद्यांद्वारे नियंत्रण ठेवले जात होते - पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) कायदा, १९२०; परदेशी नागरिक नोंदणी कायदा, १९३९; परदेशी नागरिक कायदा, १९४६ आणि स्थलांतर (वाहकांची जबाबदारी) कायदा, २०००. हे कायदे आता रद्द केले आहेत. नवीन कायद्यामुळे सरकारला परदेशी नागरिक वारंवार येणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. 

कायद्यात तरतुदी कोणत्या?कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून बनावट किंवा फसवणुकीने मिळवलेला पासपोर्ट, प्रवास कागदपत्र किंवा व्हिसा वापरल्यास किमान दोन वर्षे आणि कमाल सात वर्षांची शिक्षा तसेच किमान एक लाख व कमाल दहा लाख रुपयांचा दंड होईल. कायद्यात हॉटेल्स, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालये व नर्सिंग होम्स यांना परदेशी नागरिकांविषयीची माहिती देणे बंधनकारक केले आहे, जेणेकरून जास्त कालावधी राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा मागोवा घेता येईल. सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या व जहाजांना त्यांच्या प्रवासी व कर्मचाऱ्यांची आगाऊ माहिती आणि यादी भारतातील बंदरांवर किंवा संबंधित ठिकाणी नागरी प्राधिकरण किंवा स्थलांतर अधिकाऱ्यांना सादर करावी लागेल. नवी कायद्यानुसार वैध पासपोर्ट किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय भारत देशामध्ये प्रवेश करणाऱ्या परदेशी नागरिकाला पाच वर्षांपर्यंतची कैद किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठाेठावण्यात येणार आहे अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

टॅग्स :passportपासपोर्ट