शहरं
Join us  
Trending Stories
1
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
2
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
3
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
4
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
6
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
7
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
8
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
9
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
10
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
11
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
12
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
13
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
14
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
15
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
16
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
17
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
18
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
19
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
20
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...

बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:15 IST

परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित बाबी नियंत्रित करणारा तसेच बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्यांवर कठोर शिक्षा ठोठावणारा नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ सोमवारी देशभर लागू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: परदेशी नागरिक आणि स्थलांतर संबंधित बाबी नियंत्रित करणारा तसेच बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापरणाऱ्यांवर कठोर शिक्षा ठोठावणारा नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ सोमवारी देशभर लागू झाला. हा कायदा संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंजूर झाला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी त्यास मंजुरी दिली होती.

गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव नितेश कुमार व्यास यांच्या अधिसूचनेनुसार, “स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा, २०२५ (कलम १३, २०२५) च्या कलम १ (२) नुसार केंद्र सरकार १ सप्टेंबर २०२५ हा दिनांक या कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्यासाठी निश्चित करते.”

परदेशी वारंवार येणाऱ्या ठिकाणांवर ठेवणार लक्ष याआधी या विषयांवर चार वेगवेगळ्या कायद्यांद्वारे नियंत्रण ठेवले जात होते - पासपोर्ट (भारतामध्ये प्रवेश) कायदा, १९२०; परदेशी नागरिक नोंदणी कायदा, १९३९; परदेशी नागरिक कायदा, १९४६ आणि स्थलांतर (वाहकांची जबाबदारी) कायदा, २०००. हे कायदे आता रद्द केले आहेत. नवीन कायद्यामुळे सरकारला परदेशी नागरिक वारंवार येणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. 

कायद्यात तरतुदी कोणत्या?कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून बनावट किंवा फसवणुकीने मिळवलेला पासपोर्ट, प्रवास कागदपत्र किंवा व्हिसा वापरल्यास किमान दोन वर्षे आणि कमाल सात वर्षांची शिक्षा तसेच किमान एक लाख व कमाल दहा लाख रुपयांचा दंड होईल. कायद्यात हॉटेल्स, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्था, रुग्णालये व नर्सिंग होम्स यांना परदेशी नागरिकांविषयीची माहिती देणे बंधनकारक केले आहे, जेणेकरून जास्त कालावधी राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा मागोवा घेता येईल. सर्व आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या व जहाजांना त्यांच्या प्रवासी व कर्मचाऱ्यांची आगाऊ माहिती आणि यादी भारतातील बंदरांवर किंवा संबंधित ठिकाणी नागरी प्राधिकरण किंवा स्थलांतर अधिकाऱ्यांना सादर करावी लागेल. नवी कायद्यानुसार वैध पासपोर्ट किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय भारत देशामध्ये प्रवेश करणाऱ्या परदेशी नागरिकाला पाच वर्षांपर्यंतची कैद किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड ठाेठावण्यात येणार आहे अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

टॅग्स :passportपासपोर्ट