शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्रासह सात राज्यांना ५,९०८ रुपये मंजूर, राज्याला मिळणार ९५७ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 04:56 IST

अवकाळी पाऊस आणि पुराचा फटका बसून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ९५७ कोटी रूपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि पुराचा फटका बसून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ९५७ कोटी रूपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या सात राज्यांसाठी राष्ट्रीय नैसर्गिक संकट निधीतून (एनडीआरएफ) पाच हजार ९०८.५६ कोटी रूपयांचे आर्थिक साह्य मंजूर केले.अधिकृत सूत्रांनुसार त्यात ६१६.६३ कोटी रूपये आसामला,२८४.९३ कोटी रूपये हिमाचल प्रदेशला, १,८६९.८५ कोटी रूपये कर्नाटकला दिले जातील. याशिवाय १,७४९.७३ कोटी रूपये मध्यप्रदेश, ६३.३२ कोटी रूपये त्रिपुरा आणि ३६७.१७ कोटी रूपये उत्तर प्रदेशला दिले जातील.या बैठकीला अर्थ मंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्रालय, कृषी मंत्रालय आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या आधी केंद्र सरकारने हंगामी साह्य म्हणून चार राज्यांना ३,२०० कोटी रूपये आधीच दिले आहेत. त्यातील एक हजार २०० कोटी रूपये कर्नाटक, मध्य प्रदेशला एक हजार कोटी आणि महाराष्ट्राला ६०० आणि ४०० कोटी रूपये बिहारला दिले गेले आहेत. याशिवाय २७ राज्यांना राज्य आपदा साह्य निधीअंतर्गत २७ राज्यांना चालू आर्थिक वर्षात ८,०६८ कोटी रूपये आधीच दिले गेले आहेत.या नीधीमुळे आता राज्यातील विविध विकासकामांना चालना मिळणार असून अपूर्ण कामे पूर्ण होतील.