शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा बालमृत्यू, बीआरडी हॉस्पिटलमध्ये सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 20:31 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज कॉलेज (बीआरडी) हॉस्पिटलमध्ये 48 तासांत सात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यमुळे आणि सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गोरखपूर, दि. 29 - उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज कॉलेज (बीआरडी) हॉस्पिटलमध्ये गेल्या 48 तासांमध्ये सात बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यमुळे आणि सूज आल्यामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 105 बालकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आसतानाच आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी बीआरडी हॉस्पिटलचे माजी प्रिंसिपल राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी पूर्णिमा यांना आज कानपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. विरोधकांनी पुन्हा एकदा योगी सरकारवर टीका केली आहे. 'संवेदनाशून्य आणि अपयशी सरकार' असल्याचा आरोप केला जात आहे.

ऑस्टरच्या दुसºया आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत १0५ झाली. हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झाले असून, विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला होता.

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारकडे बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले आहे. ऑक्सिजनअभावी मुलांचा मृत्यू झाल्याची बाब योगी सरकारनं फेटाळून लावली आहे. त्यामुळे बीआरडी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालेल्या बालमृत्यूमागे नेमके कारण काय आहे?, यावर अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अलाहाबाद हायकोर्टात याप्रकरणी 29 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे बालमृत्यूप्रकरणी लखनौमधील कोर्टात याप्रकरणी खटल्यासाठी अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे. तक्रार करण्यात आलेल्या या अर्जात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्सचे संचालक मनिष भांडारी आणि ऑफिस हेड मिनू वालिया यांच्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथGorakhpurगोरखपूर