शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

यज्ञावर सात कोटी स्वाहा

By admin | Updated: December 25, 2015 03:34 IST

तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे

हैदराबाद : तेलंगणा दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या राज्यातील बहुदा आजवरची सर्वात महागडी महापूजा चालविली आहे. त्यांनी आयोजित केलेल्या अभूतपूर्व अशा अच्युत महा चंडी यज्ञावर होणारा खर्च सात कोटी रुपयांच्या घरात आहे.मेडक जिल्ह्यातील इरावल्ली या गावातील आपल्या फार्म हाऊसवर राव यांनी या यज्ञाचे पौरोहित्य सात राज्यांतील ११०० पुजाऱ्यांकडे सोपविले. २३ डिंसेबरपासृन सुरू झालेली ही पूजा पाच दिवस चालणार आहे. मंत्रोच्चाराच्या घोषात यज्ञ सुरू आहे. दैनंदिन प्रार्थनाही या पुरोहितांकडून पार पाडल्या जात आहेत. राज्यावर दुष्काळाचे संकट असताना अशा प्रकारच्या पूजेवर उधळपट्टी करणे योग्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला असता या यज्ञासाठी राज्याच्या खजिन्यातून एकही पैसा खर्च झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. असा आहे भव्य मंडप....४० हजार चौरस फूट जागेवर बांबू आणि धानाच्या तणसापासून(काड्या) महा यज्ञशाळा उभारण्यात आली आहे. एकूण १०६ यज्ञकुंडांवर आहुती दिली जात आहे. सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत ११०० पुजारी ७०० मंत्र एकाचवेळी एकसूरात उच्चारत असल्यामुळे वातावरण भारावून गेले आहे. दुपारी ३.४५ पासून पुन्हा सुरू होणारा मंत्रोच्चार संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चालतो. दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी हा यज्ञ असल्याचे सांगण्यात आले. स्वतंत्र तेलंगणाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यास महायज्ञ करण्याचा मानस राव यांनी चार वर्षांपूर्वी बोलून दाखविला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्राचे राज्यपाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, दोन केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे न्यायाधीशही महापूजेला उपस्थित राहणार आहेत.