शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बापरे! 27 हजारांचा नवा फोन घेतला अन् आठवडाभरात ब्लास्ट झाला; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 15:48 IST

एका व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला. आठवडाभरानंतर त्या मोबाईलचा स्फोट झाला.

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने नवीन मोबाईल घेतला. आठवडाभरानंतर त्या मोबाईलचा स्फोट झाला. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर तरुण आणि त्याचे कुटुंबीय घाबरले आहेत. तरुणाला आता कंपनीकडून नुकसानभरपाईही हवी आहे. जीव जाण्यासाठी ही महागडी वस्तू खरेदी केली नसल्याचं त्याने म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिवनीच्या गोपाळगंज गावात राहणाऱ्या अखिलेश साहूसोबत ही घटना घडली आहे. काही कामानिमित्त तो सिवनी येथील कान्हीवडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिनोतिया गावात आले होते. तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. बोलत असताना अचानक त्यांच्या मोबाईलमध्ये स्फोट झाला. सुरुवातीला अखिलेशला काही समजले नाही, पण थोड्या वेळाने त्याच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना दुखापत झाली. अखिलेशसोबत ही घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक मित्र उपस्थित होता. त्याने घाईघाईने अखिलेशला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून तरुणाचा जबाब नोंदवला. या स्फोटाची चौकशी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तरूणाने आपला मोबाईल एक आठवड्यापूर्वीच घेतल्याचं सांगितलं आहे. तो कोणाशी तरी बोलत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला.

एका आठवड्यापूर्वी 27 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेतल्याचं तरुणाने सांगितलं. नवीन मोबाईलमध्ये धमाका होईल हे माहीत नव्हतं. आता कंपनीने मला भरपाई द्यावी अशी माझी इच्छा आहे. या घटनेनंतर आता हा तरुण मोबाईल वापरायला घाबरत आहे. याबाबत ग्राहक मंचात तक्रार करणार असल्याचे तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलBlastस्फोट