शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वाढत्या असहिष्णूतेविरोधात ज्येष्ठ वैज्ञानिक भार्गव 'पद्म' पुरस्कार परत करणार

By admin | Updated: October 29, 2015 11:59 IST

देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव 'पद्मविभूषण' पुरस्कार सरकारला परत करणार.

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. २९ - गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ अनेक लेखक व कलावंत पुरसक्रा परत करत असताना आता त्यात शास्त्रज्ञही सहभागी झाले असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव त्यांचा 'पद्मविभूषण' पुरस्कार सरकारला परत करणार आहेत.  भारतातील पेशीय व आण्विक जीवशास्त्र केंद्राचे ( सीसीएमबी) संस्थापक असलेल्या भार्गव यांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला.

सरकार आणि संघ आमच्यावर आम्ही काय खावे, काय करावे  याबद्दल दबाव टाकत आहे, मात्र त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यावर गदा येत असून ते मला बिलकूल पसंत नाही, असे भार्गव म्हणाले. सरकार देशामध्ये जातीय आणि धर्माच्या आधारावर फूट पाडणाऱ्या गटांना मोकळीक देत आहे, असा आरोप भार्गव यांनी केला आहे.  एखादा कलाकार त्याच्या कलेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करू शकतो. पण मी वैज्ञानिक आहे, मग मी माझा निषेध कसा व्यक्त करायचा?, म्हणूनच मी मला मिळालेला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भार्गव यांनी सांगितले. 
दरम्यान एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी तो तिढा न सुटल्यामुले १२ दिग्दर्शकांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. १३९ दिवसांच्या आंदोलनानंनतर एफटीआयआयचा न सुटलेला तिढा व देशातील वाढत्या असहिष्णुतेचे कारण देत या दिग्दर्शकांना आपापले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. त्यामध्ये दिबाकर बॅनर्जी, आनंद पटवर्धन, परेश कामदार, निशिता जैन, किर्ती नाखवा, हर्षवर्धन कुलकर्णी, हरी नायर, राकेश शर्मा, इंद्रनील लहरी आणि लिपिका सिंग दराई यांचा समावेश आहे.