शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कन्हैय्याची लीला अपार; वरिष्ठांना डावलून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:52 IST

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 125 सदस्यांच्या नावांचीही यावेळी घोषणा करण्यात आली.

तिरुवनंतपूरम: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनानंतर प्रकाशझोतात आलेला विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलून कन्हैया कुमारला ही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सीपीआयमधील एका गटात नाराजी पसरली आहे. कोल्लाम येथे झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात एस. सुधाकर रेड्डी यांची सलग तिसऱ्यांदा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. याशिवाय, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 125 सदस्यांच्या नावांचीही यावेळी घोषणा करण्यात आली. यामध्ये कन्हैया कुमारला स्थान देण्यात आले आहे. परंतु, सी. दिवाकरन, सथ्यन मोकरी, सी.एन. चंद्रन व कमला सदानंदन या वरिष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. यावरून हे नेते नाराज असल्याचे समजते. याविषयी बोलताना सी. दिवाकरन यांनी म्हटले की, पक्षात माझा कोणीही गॉडफादर नाही. मलादेखील कोणाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय कार्यकारिणीत टिकून राहण्यात कोणताही रस नसल्याचे त्यांनी म्हटले. तर पक्षाचे सचिव कनम राजेंद्रन यांनी दिवाकरन आणि अन्य नेत्यांच्या गच्छंतीचे समर्थन केले आहे. पक्षाची नवी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारिणीत 20 टक्के नवे चेहरे असणे अपेक्षित आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे राजेंद्रन यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार जनतेची लूट करणारी आर्थिक धोरणे राबवत आहे. या सरकारच्या काळात देशातील लोकशाही व निधर्मी मुल्यांचा ऱ्हास झाल्याचे रेड्डी यांनी सांगितले.  

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार