शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'सरकारी मालमत्ता विका आणि सरकार चालवा' हेच धोरण; शिवसेनेचा केंद्राविरुद्ध संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:00 IST

सरकारकडून सध्या प्राधान्याने आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते.

मुंबई - केंद्र सरकारला दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करावयाचे आहे. त्यासाठी, अर्थ विभागाने प्रयत्नही सुरू केले असून ३१ मार्च २०२४ पर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वीच या बँकांचे खासगीकरण होऊ शकते. त्यासाठी, सरकारला बँकींग कायद्यात बदल करावे लागणार आहेत. सरकारच्या या खासगीकरणाच्या धोरणावरच शिवसेनेनं संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून 'खासगीकरणाचा वरवंटा' या मथळ्याखाली अग्रलेख लिहित केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांच्या खासगीकरणाविरोधातील धोरणाला कडाडून विरोध दर्शवला आहे. 

सरकारकडून सध्या प्राधान्याने आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते. तर, आणखी एक म्हणजेच दोन बँकांच्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यावरुन, शिवसेनेनं संताप व्यक्त करत मोदी सरकारवर प्रखर शब्दात टीका केली. मागील सात दशकांत देशाने जे जे उभे केले, कमावले ते ते सगळे मोडीत काढायचे, विकायचे. त्यावर खासगीकरणाचा वरवंटा फिरवायचा, हेच धोरण गेल्या सात वर्षांत राबविले जात आहे, असे म्हणत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 

'नवसंजीवनी'च्या मुखवटय़ाआड दडलेला मोदी सरकारचा 'चेहरा' हा असा भयंकर आहे. नाहीतरी लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक सौहार्द्र, जातीय-धार्मिक सलोख्यापासून कायद्याच्या राज्यापर्यंत सगळय़ांचा 'लिलाव'च या सरकारने मांडला आहे. त्यात आणखी काही सरकारी बँकांचा आता 'पुकारा' होणार आहे. मागील सात दशकांत देशाने जे जे उभे केले, कमावले ते ते सगळे मोडीत काढायचे, विकायचे. त्यावर खासगीकरणाचा वरवंटा फिरवायचा, हेच धोरण गेल्या सात वर्षांत राबविले जात आहे.

शेतकऱ्यांनी डाव उधळून लावला

मोदी सरकारच्या या रोखीकरणाच्या त्सुनामीमध्ये देशाचे 'मानचिन्ह' ठरलेल्याएअर इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशनसारख्या कंपन्यांपासून सरकारी बँका, कंपन्या आणि सार्वजनिक उपक्रम, प्रवासी रेल्वे आणि स्थानके, विमानतळ, रस्ते, स्टेडियम, गॅस, वीज, विमा कंपन्यांपर्यंत सगळेच आतापर्यंत वाहून गेले आहे. अगदी सरकारी कंपन्यांच्या जमिनीही विक्रीला काढल्या जात आहेत. नवीन शेती कायद्यांच्या माध्यमातून शेती आणि सामान्य शेतकऱ्यांवरही खासगीकरणाचा नांगर फिरविण्याचे मोदी सरकारचे मनसुबे होते, परंतु देशभरातील शेतकरी एकजुटीने ते उधळले गेले. 

सरकारी मालमत्ता विका आणि देश चालवा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 'नवसंजीवनी' देण्याचा उद्देश या धोरणामागे असल्याचा दावा आणि वादा केंद्र सरकार नेहमीच करीत असते. मात्र 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या व्यापारी वृत्तीने 'सरकारी मालकी हक्का'चा लिलाव मोदी सरकारकडून केला जात आहे. गेल्या वर्षी देशातील 10 सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करून चार मोठय़ा बँकांची स्थापना करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते. मात्र, कोविड लाटेमुळे या बँका सरकारच्या तडाख्यातून बचावल्या होत्या. तथापि, त्यांच्याशिवाय काही मध्यम आणि छोटय़ा सरकारी बँकांचे अस्तित्व आता पुसले जाऊ शकते. कारण सरकारच्या रडारवर मोठय़ा बँकांनंतर मध्यम आणि लहान बँका आहेत. मुळात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून 'सरकारी मालमत्ता विका आणि सरकार चालवा' हेच धोरण राबविले जात आहे. त्यासाठी सरकारी मालमत्तांचे 'मॉनिटायझेशन' म्हणजे 'रोखीकरण' करण्याची घोषणा केली गेली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकारbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र