शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

By admin | Updated: July 14, 2017 08:52 IST

गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 14 - गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. देशातील काही भागांमध्ये कथित गोरक्षणावरुन होणा-या हिंसेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत की,  स्वयंघोषित गोरक्षक हे खरंतर नरभक्षकप्रमाणे आहेत.  
 
अहमदाबादमध्ये अनेक राज्यांतील सामाजिक कल्याण विभागाची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात हे दोन्ही मंत्री बोलत होते. यावेळी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दमन दीव आणि दादरा तसंच हवेलीतीलही सामाजिक कल्याण मंत्रीदेखील उपस्थित होते. 
 
गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक व दलितांवर होणा-या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गहलोत यांनी सांगितले की, पार्टी व सरकारचं असे स्पष्ट मत आहे की कायदा हातात घेणा-या कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यात येणार नाही.  गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. 
 
आणखी बातम्या वाचा
 
गुजरातमधील ऊना येथे कथित गोरक्षण नावाच्या दलित तरुणांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर बोलताना गहलोत म्हणाले की, गुजरात सरकारनं या प्रकरणात गतीनं काम केलं व पीडितांना न्याय मिळवून दिला. तर आठवले म्हणाले की, भाजपा सरकारसहीत देशभरातील अन्य सरकार गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणा-या लोकांविरोधात कारवाई करत आहेत. ही लोकं गोरक्षक नाहीत, तर नरभक्षक आहेत.  पूर्वीदेखील दलितांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आंतरजातीय विवाह पद्धतीबाबत जनजागृती केली पाहिजे. आमचे मंत्रालयदेखील आंतरराजीत विवाह पद्धतीसंदर्भात जनजागृती करत आहे.
 
दरम्यान, गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार आहे, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले होते.