शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

By admin | Updated: July 14, 2017 08:52 IST

गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 14 - गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. देशातील काही भागांमध्ये कथित गोरक्षणावरुन होणा-या हिंसेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत की,  स्वयंघोषित गोरक्षक हे खरंतर नरभक्षकप्रमाणे आहेत.  
 
अहमदाबादमध्ये अनेक राज्यांतील सामाजिक कल्याण विभागाची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात हे दोन्ही मंत्री बोलत होते. यावेळी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दमन दीव आणि दादरा तसंच हवेलीतीलही सामाजिक कल्याण मंत्रीदेखील उपस्थित होते. 
 
गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक व दलितांवर होणा-या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गहलोत यांनी सांगितले की, पार्टी व सरकारचं असे स्पष्ट मत आहे की कायदा हातात घेणा-या कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यात येणार नाही.  गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. 
 
आणखी बातम्या वाचा
 
गुजरातमधील ऊना येथे कथित गोरक्षण नावाच्या दलित तरुणांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर बोलताना गहलोत म्हणाले की, गुजरात सरकारनं या प्रकरणात गतीनं काम केलं व पीडितांना न्याय मिळवून दिला. तर आठवले म्हणाले की, भाजपा सरकारसहीत देशभरातील अन्य सरकार गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणा-या लोकांविरोधात कारवाई करत आहेत. ही लोकं गोरक्षक नाहीत, तर नरभक्षक आहेत.  पूर्वीदेखील दलितांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आंतरजातीय विवाह पद्धतीबाबत जनजागृती केली पाहिजे. आमचे मंत्रालयदेखील आंतरराजीत विवाह पद्धतीसंदर्भात जनजागृती करत आहे.
 
दरम्यान, गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार आहे, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले होते.