शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले

By admin | Updated: July 14, 2017 08:52 IST

गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 14 - गोरक्षणाच्या मुद्यावरुन देशातील काही ठिकाणी हाणामारी, हत्या यांसारख्या हिंसक घटना घडत आहेत. यामुळे सर्व स्तरातून भाजपा व केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. देशातील काही भागांमध्ये कथित गोरक्षणावरुन होणा-या हिंसेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितले की, कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणालेत की,  स्वयंघोषित गोरक्षक हे खरंतर नरभक्षकप्रमाणे आहेत.  
 
अहमदाबादमध्ये अनेक राज्यांतील सामाजिक कल्याण विभागाची प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात हे दोन्ही मंत्री बोलत होते. यावेळी गुजरात, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दमन दीव आणि दादरा तसंच हवेलीतीलही सामाजिक कल्याण मंत्रीदेखील उपस्थित होते. 
 
गोरक्षणाच्या नावावर अल्पसंख्यांक व दलितांवर होणा-या हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर गहलोत यांनी सांगितले की, पार्टी व सरकारचं असे स्पष्ट मत आहे की कायदा हातात घेणा-या कोणत्याही व्यक्तीची सुटका करण्यात येणार नाही.  गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणा-या लोकांवर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. 
 
आणखी बातम्या वाचा
 
गुजरातमधील ऊना येथे कथित गोरक्षण नावाच्या दलित तरुणांना करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणावर बोलताना गहलोत म्हणाले की, गुजरात सरकारनं या प्रकरणात गतीनं काम केलं व पीडितांना न्याय मिळवून दिला. तर आठवले म्हणाले की, भाजपा सरकारसहीत देशभरातील अन्य सरकार गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणा-या लोकांविरोधात कारवाई करत आहेत. ही लोकं गोरक्षक नाहीत, तर नरभक्षक आहेत.  पूर्वीदेखील दलितांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना नियंत्रणात आणण्यासाठी आंतरजातीय विवाह पद्धतीबाबत जनजागृती केली पाहिजे. आमचे मंत्रालयदेखील आंतरराजीत विवाह पद्धतीसंदर्भात जनजागृती करत आहे.
 
दरम्यान, गायींची कत्तल करणाऱ्यांना आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारा कडक कायदा गुजरात सरकारने केला. गाय आमची माता आहे. दूध उत्पादनात गुजरात देशात सर्वात मोठा करण्याचा प्रयत्न. देशी गायींचे संवर्धन व्हावे, चांगल्या वाणाचे गोधन तयार व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात नंदीग्राम उभारण्यात येणार आहे, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केले होते.