शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शेतकरी आंदोलन चिघळल्यास सुरक्षा धोक्यात; विघातक प्रवृत्ती घेतील गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 07:59 IST

तातडीने तोडगा काढण्याची मागणी

शीलेश शर्मानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन योग्य तोडगा काढून लवकर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तसे न होता हे आंदोलन आणखी चिघळल्यास त्याचा विघातक प्रवृत्ती गैरफायदा घेण्याची व त्यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाकडे खलिस्तानवादी प्रवृत्ती बारीक लक्ष ठेवून आहेत. हे आंदोलन अधिक चिघळले तर खलिस्तानवादी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बहुतांश पंजाबमधील शेतकरी आहेत. योग्य तोडगा काढून हे आंदोलन लवकरात लवकर न थांबविल्यास त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे कळते.

आंदोलकांवर ड्रोनद्वारे बारीक नजर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबची आर्थिक घडी विस्कटली आहे, असा दावाही त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडा, ब्रिटनमधून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार अधिक सतर्क झाले आहे. शेतकरी आंदोलकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच आंदोलनाची बारीकसारीक माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अतिशय सक्रिय झाल्या आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार