शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शेतकरी आंदोलन चिघळल्यास सुरक्षा धोक्यात; विघातक प्रवृत्ती घेतील गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 07:59 IST

तातडीने तोडगा काढण्याची मागणी

शीलेश शर्मानवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन योग्य तोडगा काढून लवकर संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तसे न होता हे आंदोलन आणखी चिघळल्यास त्याचा विघातक प्रवृत्ती गैरफायदा घेण्याची व त्यामुळे देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, नवीन कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाकडे खलिस्तानवादी प्रवृत्ती बारीक लक्ष ठेवून आहेत. हे आंदोलन अधिक चिघळले तर खलिस्तानवादी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे, असा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बहुतांश पंजाबमधील शेतकरी आहेत. योग्य तोडगा काढून हे आंदोलन लवकरात लवकर न थांबविल्यास त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांना सांगितल्याचे कळते.

आंदोलकांवर ड्रोनद्वारे बारीक नजर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबची आर्थिक घडी विस्कटली आहे, असा दावाही त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडा, ब्रिटनमधून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार अधिक सतर्क झाले आहे. शेतकरी आंदोलकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच आंदोलनाची बारीकसारीक माहिती मिळविण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अतिशय सक्रिय झाल्या आहेत.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपCentral Governmentकेंद्र सरकार