शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

जम्मू काश्मीरच्या सुरक्षेसाठी २६ वर्षात ५ हजार कोटी खर्च

By admin | Updated: April 14, 2016 12:09 IST

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाने दोन दशकांमध्ये पाच हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे अशी माहिती गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आर्थिक अहवालात देण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत -
जम्मू काश्मीर, दि. १४ - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी गृहमंत्रालयाने दोन दशकांमध्ये पाच हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. 2015-16 आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत 286 कोटींचा खर्च करण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आर्थिक अहवालात देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील बंडखोरीचे प्रमाण तसंच नागरिक जखमी होण्याच्या घटनांमध्ये घट झाल्याची माहितीही गृहमंत्रालयाने दिली आहे.
    
या खर्चामध्ये सुरक्षा जवानांना देण्यात येणारा पगार, राज्य सरकारला देण्यात येणारा निधी आणि जम्मूमधील स्थलांतरित काश्मिरी पंडितांसाठीच्या रेशनची नोंद करण्यात आली आहे. अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार केंद्राने 1998 ते 2015 दरम्यान 5021 कोटी खर्च केले आहेत. जम्मूमध्ये 40 हजार नोंदणीकृत काश्मिरी पंडित आहेत. एकूण 18250 कुटुंब आहेत ज्यांच्यातील प्रत्येकाला दरदिवशी 2500 रुपये आणि रेशन दिलं जात. याचा अर्थ प्रत्येक कुटुंबाला दर दिवशी कमीत कमी 10 हजार रुपये दिले जातात.
 
या खर्चामध्ये राज्य सरकारला  देण्यात येणा-या भरपाईची माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने सुरक्षेसाठी केलेला खर्च ज्यामध्ये विशेष अधिका-यांच्या मानधनाचाही समावेश आहे. राज्यात सध्या 24,068 विशेष अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसंच वाहतूक, सुरक्षा जवानांसाठी पर्यायी जागेचा खर्च यांचीही नोंद करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवर गृहमंत्रालय, राज्य सरकार तसंच संरक्षण मंत्रालय नेहमी लक्ष ठेवून असतं. 
एकीकडे दहशतवादाशी लढण्यासाठी नवी धोरण अंमलात आणली गेली तर दुसरीकडे तरुणांना दहशतावादाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी नव्या योजना अंमलात आणल्या गेल्या. दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी दुस-या मार्गाचा वापर करत असल्याने सीमेवरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. 
 
1990 पासून जम्मू काश्मीरमध्ये लष्कर तैनात करण्यात आलं तेव्हापासून ते 2015 पर्यंत 13,921 नागरिकांचा तर 4,961 जवानांचा मृत्यू झाला आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार 2015मध्ये घुसखोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. घुसखोरीचे 118 प्रयत्न करण्यात आले ज्यामधील 36 प्रयत्न यशस्वी झाले तर 2014 मध्ये 209 प्रयत्न झाले होते ज्यामधील 69 यशस्वी झाले होते.