शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

निर्बंध हटविण्याचा दुसरा टप्पा ८ जूननंतर; पंतप्रधानांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:46 IST

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास प्राधान्य

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथ फार फैलू नये यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्याचा दुसरा टप्पा येत्या सोमवारी, ८ जूननंतर अमलात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)च्या वार्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी मंगळवारी आवाहन केले की, उद्योजकांनी एक पाऊल पुढे यावे, केंद्र सरकार चार पावले पुढे येईल. आम्ही उद्योग क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.कोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारला. तेव्हापासूनच्या ७० दिवसांत या लॉकडाऊनचे चार टप्पे झाले. देशात उद्योगधंदे व सार्वजनिक, खासगी वाहतूक सेवा बरेच दिवस बंद होती. साथ व लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लाखो लोक बेकार झाले, स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परत जाताना खूप हाल सोसावे लागले. लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा मानला होता. आता त्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास प्राधान्य दिले आहे.

सीआयआयचा वार्षिक कार्यक्रम यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन मागे घेण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात बरेच निर्बंध हटविण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी निर्बंध दूर करण्यात येतील. देशामध्ये लॉकडाऊनची असलेली स्थिती आता हळूहळू बदलत असून, आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. देशात तीन महिन्यांपूर्वी एकही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा (पीपीई) संच बनत नव्हता. आता दर दिवसाला तीन लाख पीपीई संच तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, सीआयआयने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाबाबत आराखडा तयार करून तो सरकारला सादर करावा. आम्ही ते आराखडे राबविण्यासाठी पावले उचलणार आहोत.

लॉकडाऊनचा निर्णय योग्यचमोदी म्हणाले की, देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे देशाने हव्या त्या गोष्टी साध्य केल्या आहेत. कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थविकासाचा वेग कमी झाला असेल; पण आता त्यावर मात करून आम्हाला पुढे जायचे आहे.

रोजगार, विश्वास निर्माण करायचा आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, क्षमता व तंत्रज्ञानावर मला पूर्ण विश्वास आहे. स्वदेशात आपल्याला यापुढे अशी उत्पादने बनवायची आहेत जी जागतिक बाजारपेठेत अव्वल ठरतील. रोजगार व विश्वास निर्माण करणे, हा आत्मनिर्भर भारताचा खरा अर्थ आहे. कोरोना विषाणूशी लढता-लढता आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेलाही उभारी देण्याचे काम करायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी