शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध हटविण्याचा दुसरा टप्पा ८ जूननंतर; पंतप्रधानांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 06:46 IST

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास प्राधान्य

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथ फार फैलू नये यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेण्याचा दुसरा टप्पा येत्या सोमवारी, ८ जूननंतर अमलात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कॉन्फडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)च्या वार्षिक कार्यक्रमामध्ये त्यांनी मंगळवारी आवाहन केले की, उद्योजकांनी एक पाऊल पुढे यावे, केंद्र सरकार चार पावले पुढे येईल. आम्ही उद्योग क्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.कोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन पुकारला. तेव्हापासूनच्या ७० दिवसांत या लॉकडाऊनचे चार टप्पे झाले. देशात उद्योगधंदे व सार्वजनिक, खासगी वाहतूक सेवा बरेच दिवस बंद होती. साथ व लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने लाखो लोक बेकार झाले, स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परत जाताना खूप हाल सोसावे लागले. लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा मानला होता. आता त्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यास प्राधान्य दिले आहे.

सीआयआयचा वार्षिक कार्यक्रम यंदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन मागे घेण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात बरेच निर्बंध हटविण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी निर्बंध दूर करण्यात येतील. देशामध्ये लॉकडाऊनची असलेली स्थिती आता हळूहळू बदलत असून, आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. देशात तीन महिन्यांपूर्वी एकही पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा (पीपीई) संच बनत नव्हता. आता दर दिवसाला तीन लाख पीपीई संच तयार होत आहेत. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, सीआयआयने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाबाबत आराखडा तयार करून तो सरकारला सादर करावा. आम्ही ते आराखडे राबविण्यासाठी पावले उचलणार आहोत.

लॉकडाऊनचा निर्णय योग्यचमोदी म्हणाले की, देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे देशाने हव्या त्या गोष्टी साध्य केल्या आहेत. कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थविकासाचा वेग कमी झाला असेल; पण आता त्यावर मात करून आम्हाला पुढे जायचे आहे.

रोजगार, विश्वास निर्माण करायचा आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, क्षमता व तंत्रज्ञानावर मला पूर्ण विश्वास आहे. स्वदेशात आपल्याला यापुढे अशी उत्पादने बनवायची आहेत जी जागतिक बाजारपेठेत अव्वल ठरतील. रोजगार व विश्वास निर्माण करणे, हा आत्मनिर्भर भारताचा खरा अर्थ आहे. कोरोना विषाणूशी लढता-लढता आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेलाही उभारी देण्याचे काम करायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी