दुसर्या दिवशी दोन मेंढ्यांचा मृत्यू २५ मेंढ्यांवर उपचार सुरू
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
वाखरी पालखी तळ विषबाधा प्रकरण : जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांची भेट
दुसर्या दिवशी दोन मेंढ्यांचा मृत्यू २५ मेंढ्यांवर उपचार सुरू
वाखरी पालखी तळ विषबाधा प्रकरण : जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांची भेट फोटो क्रमांक : २० पंड ४फोटो ओळी : वाखरी येथील शिळ्या अन्नाचा कचरा एकत्र करून तो नष्ट करण्यात आलाउपरी : वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर पडलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याने बुधवारी २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला तर गुरुवारी दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय आणखी पंचवीस मेंढ्या अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली.आषाढी यात्रेत पंढरपुरात येणार्या सात मुख्य पालख्यांचा वाखरी येथे शेवटचा मुक्काम असतो. त्यामुळे या सातही पालख्यांबरोबर आलेल्या लाखो भाविकांची येथे गर्दी असते. भाविकांनी जेवण करून शिल्लक राहिलेले अन्न, पत्रावळ्या पालखी तळावरच टाकल्या होत्या. हेच शिळे अन्न सांगोल्याहून आलेल्या मेंढरांनी मंगळवारी खाल्ल्याने विषबाधा होऊन २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तब्बल तीन लाखांहून अधिक नुकसान झाले असल्याने फक्त पंचनामा करू नका, तत्काळ मदत करा, अशी मागणी मेंढपाळांनी प्रशासनाकडे केली आहे. अद्यापपर्यंत सोलापूर जिल्ात दमदारपणे पाऊस न पडल्याने दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळेच सांगोला तालुक्यातील काही मेंढपाळ पंढरपूर तालुक्यात मेंढ्या घेऊन आले आहेत. गुरुवारपर्यंत बजरंग मोहन मासाळ यांच्या ७, तुकाराम सिदा सलगर यांच्या ७, पप्पू जयवंत सलगर यांच्या ११ अशा एकूण २५ मेंढ्यांचा मृत्यू होऊन तीन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. उर्वरित ४५ मेंढ्यांना देखील अन्नातून विषबाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुरुवारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, सहाय्यक आयुक्त डॉ. ए.टी.परिहार, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस.भिंगारे यांनी २५ मेंढ्यांवर उपचार केले आहेत. नगरपालिकेकडून स्वच्छता मोहिमेचा फार्स ही घटना घडताच प्रशासनाला जाग आली आहे. वाखरी पालखी तळ हे पंढरपूर नगरपालिकेच्या ताब्यात आहे. यामुळे बुधवारपासून नगरपालिकेने पालखी तळाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आहे. गुरूवारी पालखी तळाची स्वच्छता करीत जागोजागी कचर्याचे ढीग करून पेटवून दिले. मात्र पालखी तळाच्या बाजूला असलेल्या पत्रावळ्या व शिळे अन्न तसेच असल्यामुळे या स्वच्छता मोहिमेचा फार्सच असल्याचे दिसत आहे.