शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
बालपणीचे मित्र, इंदूरमधला कॅफे...राजाच्या हत्येसाठी राजने ३ मित्रांना कसं तयार केले?
4
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
5
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
6
बाबो! बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज विकून खुशीने कमावले तब्बल १० कोटी, म्हणाली...
7
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
8
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
9
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
10
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
11
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
12
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
13
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
14
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
15
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
16
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
17
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
18
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
19
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
20
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!

‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 09:25 IST

cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत.

कोलकाता : यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचे नुकसान झाले असून, या स्थितीने हवालदिल झालेले लोक आता केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची वाट पाहात आहेत.पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्हा तसेच शंकरपूर या भागांना यास वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. तेथील असंख्य वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या भागामध्ये चक्रीवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाल्याने जे लोक बेघर झाले आहेत ते एकतर आपल्या नातेवाइकांच्या घरी राहायला गेले आहेत किंवा अक्षरश: रस्त्यावर राहात आहेत. शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या पुतुल याने सांगितले की, यास चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात माझे घर वाहून गेले. 

अनेक गावे पुराच्या वेढ्यात पश्चिम बंगालमधील मिदनापूर  व शंकरपूरप्रमाणेच यास चक्रीवादळाने बंकुरा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम या जिल्ह्यांनाही तडाखा दिला आहे. तेथील सुमारे १,१०० गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्या भागात सुमारे ५० हजार लोक बेघर झाले आहेत. यास वादळाचा काही प्रभाव गुरुवारीही शिल्लक होता. या दिवशी कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी उत्तर, दक्षिण २४ परगणा, मुशिराबाद येथे पाऊस पडला.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा