शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

‘यास’च्या तडाख्याने बेघर निवाऱ्याच्या शोधात, सरकारच्या मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 09:25 IST

cyclone yaas: यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत.

कोलकाता : यास चक्रीवादळाच्या तडाख्याने बुधवारी पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये हजारो लोक बेघर झाले असून, ते आता निवाऱ्याच्या शोधात आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन लाख घरांचे नुकसान झाले असून, या स्थितीने हवालदिल झालेले लोक आता केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची वाट पाहात आहेत.पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्हा तसेच शंकरपूर या भागांना यास वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. तेथील असंख्य वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी काही दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या भागामध्ये चक्रीवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाल्याने जे लोक बेघर झाले आहेत ते एकतर आपल्या नातेवाइकांच्या घरी राहायला गेले आहेत किंवा अक्षरश: रस्त्यावर राहात आहेत. शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या पुतुल याने सांगितले की, यास चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात माझे घर वाहून गेले. 

अनेक गावे पुराच्या वेढ्यात पश्चिम बंगालमधील मिदनापूर  व शंकरपूरप्रमाणेच यास चक्रीवादळाने बंकुरा, दक्षिण २४ परगणा, झारग्राम या जिल्ह्यांनाही तडाखा दिला आहे. तेथील सुमारे १,१०० गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्या भागात सुमारे ५० हजार लोक बेघर झाले आहेत. यास वादळाचा काही प्रभाव गुरुवारीही शिल्लक होता. या दिवशी कोलकाता, पूर्व आणि पश्चिम मिदनापूर, हावडा, हुगळी उत्तर, दक्षिण २४ परगणा, मुशिराबाद येथे पाऊस पडला.

टॅग्स :cycloneचक्रीवादळwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा