शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पांगरी येथील रेशन दुकान सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 15:05 IST

सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे.

सिन्नर : गेल्या काही महिन्यांपासून नियमित धान्य वितरीत होत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पुरवठा विभागाकडून तालुक्यातील पांगरी येथील स्वस्त रेशन दुकान सील केले आहे. पांगरी खुर्द व पांगरी बुद्रुक येथील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत व पुरवठा विभागाकडे अनेक वेळा तक्रार केली होती. दुकान नियमितपणे न उघडणे, नियमित धान्याचे वितरण न होणे, याबाबत ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराविरोधात तक्रारी केल्या होत्या. तालुका पुरवठा निरीक्षक विशाल धुमाळ यांनी दोन महिन्यांपूर्वी सदर दुकानदारास समज दिली होती. आॅक्टोबर महिन्याचा धान्यमाल वाटप करण्यात आला नाही, यामुळे शुक्र वारी (दि.१) सकाळी ११ वाजता पुरवठा निरीक्षक धुमाळ यांनी प्रत्यक्ष भेट देवून पंचनामा केला. सरपंच मीना शिंदे, मच्छिंद्र शिंदे, वसंत सालके, सचिन दळवी, बाबासाहेब शिंदे यांच्या सही व साक्षीने दुकान सील करण्यात आले.------------------------------सदर दुकानदाराबाबत अनेक तक्र ारी आल्या होत्या. घरोघरी जाऊन अंगठ्याचे ठसे घेत होता. धान्याचे कमी वाटप केले जात होते. त्यात अनियमतिता असल्याने दुकान सील करण्यात आले आहे. लाभार्थ्यांसाठी येत्या दोन दिवसात पांगरी येथील भानुदास पांगारकर यांच्या स्वस्त धान्य दुकानला तात्पुरते रेशन वाटप वर्ग करण्यात येईल.-विशाल धुमाळ, तालुका पुरवठा निरीक्षक

टॅग्स :Nashikनाशिक