शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"शिवलिंगावरील विंचू..."; थरूर यांच्या त्या वक्तव्यावरून HC नं फटकारलं, म्हणाले - पंतप्रधानांची बदनामी झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:53 IST

न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली...

काँग्रेस नेते शशी थरूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात ‘शिवलिंगावरील विंचू’ असे भाष्य केले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने थरूर यांच्या विरोधातील मानहानीची कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, पंतप्रधानांवर करण्यात आलेले आरोप प्रथमदर्शनी घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत. तसेच, या टिप्पण्यांमुळे पंतप्रधान, भारतीय जनता पक्ष तसेच त्यांचे अधिकारी आणि सदस्य यांची बदनामी झाली आहे. याच बरोबर, न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी मानहानीच्या कारवाईला आव्हान देणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावली.

पंतप्रधानांची बदनामी -खालच्या कोर्टात प्रलंबित मानहानीची कारवाई रद्द करण्याची मागणी करणारी थरूर यांची याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती मेंदीरत्ता म्हणाले, आयपीसीच्या कलम 500 (मानहानीची शिक्षा) अंतर्गत समन्स जारी करण्यासाठी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पुरेशी सामग्री आहे.

उच्च न्यायालयाने 16 ऑक्टोबर 2020 रोजी मानहानीच्या तक्रारीत तिरुअनंतपुरमचे लोकसभा खासदार शशी थरूर यांच्याविरुद्धच्या फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने गुरुवारी आपला अंतरिम आदेश रद्द केला आणि संबंधित पक्षकारांना 10 सप्टेंबर रोजी खालच्या कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

काय म्हणाले न्यायाधीश - आदेशाची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले होते, ‘कारवाई रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही. कनिष्ठ न्यायालयापुढे कारवाई सुरू ठेवण्याची परवानगी देणे, हे न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल. थरूर यांनी कनिष्ठ न्यायालयाचा 27 एप्रिल, 2019 चा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. भाजप नेते राजीव बब्बर यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या तक्रारीत कनिष्ठ न्यायालयाने थरूर यांना आरोपी म्हणून समन्स बजावले होते. 2 नोव्हेंबर 2018 रोजी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.

राजीव बब्बर यांनी कनिष्ठ न्यायालयात थरूर यांच्या विरोधात फोजदारी तक्रार दाखल करत, त्यांच्यामुळे आपल्या धार्मिक भावनां दुखावल्याचे म्हटले होते. न्यायमूर्ती मेंदीरत्ता यांनी 51 पानांच्या निर्णयात म्हटले आहे की, "'प्रथम दृष्ट्या, विद्यमान पंतप्रधानांवर करण्यात आलेले आरोप घृणास्पद आणि निषेधार्ह आहेत. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्याबरोबरच, यामुळे, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी व सदस्यांचीही बदनामी होते.

काय म्हणाले होते थरूर - थरूर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये दावा केला होता की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका निनावी नेत्याने पंतप्रधान मोदींची तुलना 'शिवलिंगावर बसलेल्या विंचवाशी' केली होती. जून 2019 मध्ये थरूर यांना खालच्या न्यायालयाने संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 (मानहानी) आणि 500 ​​(बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीHigh Courtउच्च न्यायालय