शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

पुरस्कार वापसीत आता वैज्ञानिकही

By admin | Updated: October 30, 2015 01:34 IST

देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलले आहे

नवी दिल्ली : देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांमुळे निषेधाचे सूर भक्कम होत असताना वैज्ञानिक आणि इतिहासकारांनीही आता रालोआ सरकारविरुद्ध आवाज बुलंद करीत ‘पुरस्कार वापसी’चे पाऊल उचलले आहे. रालोआ सरकारने देशात हिंदू धर्मीय हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालविल्याचा थेट आरोप करीत प्रसिद्ध वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी गुरुवारी पुढील आठवड्यात पद्मभूषण पुरस्कार परत करीत असल्याची घोषणा केली. शिवाय सरकारी अविवेकाचा तीव्र निषेध करणारे निवेदन लेखक, कलाकार, चित्रपटनिर्माते, वैज्ञानिकांसह ५० पेक्षा जास्त इतिहासकारांनी गुरुवारी केले.अशी चिंता व्यक्त करणाऱ्या वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांमध्ये पद्मभूषण विजेते अशोक सेन, पी. बलराम आदींचा तर समावेश आहे. तर रोमिला थापर, इरफान हबीब, के.एन. पन्नीकर आणि मृदुला मुखर्जी आदी नामवंतांसह एकूण ५३ इतिहासकारांच्या वतीने ‘सहमत’ ने संयुक्त निवेदन जारी केले आहे.हैदराबाद येथे हैदराबादेतील सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅन्ड मॉलेक्युलर बायोलॉजीचे संस्थापक ८७ वर्षीय वैज्ञानिक पुष्पमित्र भार्गव यांनी १९८६ मध्ये मिळालेला पद्मभूषण किताब परत करण्याचे जाहीर करताना देशातील वातावरणाकडे लक्ष वेधले. महत्त्वाच्या पदांवर रा.स्व.संघाशी संलग्न लोकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. भाजपा ही रा.स्व. संघाची राजकीय आघाडी आहे. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संचालकांच्या बैठकीला संघाच्या लोकांनी हजेरी लावावी असे इतिहासात कधीही घडले नव्हते, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)