शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विज्ञान आणि गणित विद्यार्थ्यांचे नावडते विषय

By admin | Updated: May 16, 2016 10:33 IST

गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे. 
 
गणित आणि विज्ञान विषयात रुची नसल्यामुळे विद्यार्थी पुढे मानवविज्ञान आणि कॉमर्स या विषयांकडे वळत असल्याचेही समितीने म्हटले आहे. गणित, विज्ञान या दोन विषयात दर्जेदार आणि चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचेही या समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने योजना आखण्यासाठी विशेष कार्यदलाची स्थापना करण्याची सूचना समितीने आपल्या अहवालात केली आहे. 
 
गणित-विज्ञान शिकवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याबाबत शिक्षकही तितके गंभीर नसल्याचे समितीने म्हटले आहे. समितीने दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तरप्रदेशमधील शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तसेच विविध माहितींचा अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे. 
 
विज्ञान आणि गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करण्यासाठी केंद्रीय पातळीवरुन झालेले  सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विज्ञान विषय शाळेमध्ये वैज्ञानिक संशोधनाची रुची निर्माण होईल अशा दृष्टीकोनातून शिकवला गेला पाहिजे असे नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे देशाला प्रगतीची नवी शिखरे गाठता येतील असे मोदींचे मत आहे.