शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

शाळांनी परदेश वारी सोडून आधी मुलांना भारत दाखवावे - महेश शर्मा

By admin | Updated: November 23, 2014 15:53 IST

शाळांनी मुलांची सहल परदेशात नेण्याऐवजी आधी त्यांना भारत दाखवावे असे परखड मत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. २३ - शाळांनी मुलांची सहल परदेशात नेण्याऐवजी आधी त्यांना भारत दाखवावे असे परखड मत केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मांडले आहे. यासंदर्भात नियम आणण्यासाठी शर्मा यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली असून हा नियम लागू झाल्यास शाळांच्या परदेश वा-यांवर लगाम लागणार आहे.
शाळांमधील परदेशी भाषांपाठोपाठ परदेश दौ-यांवरही भाजपा सरकारने आक्षेप घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शाळांच्या परदेशातील सहलींवर पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. शर्मा म्हणाले, भारतातील मुलांना दुबई, मलेशिया आणि थायलंडमध्ये जायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम भारताचा दौरा करावा असे मत शर्मा यांनी मांडले. शालेय सहली भारतातील ऐतिहासिक वास्तू, स्मृतीस्थळं येथे नेण्याचे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शर्मा यांनी स्मृती इराणी यांच्याशीही चर्चा केली आहे. परदेशामध्ये त्यांच्या पर्यटन स्थळांची नियोजनबद्ध पद्धतीने प्रसिद्धी दिली जाते व आपण यातच कमी पडतो अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुलांच्या देशांतर्गत सहली वाढल्यास त्यांना भारताचा इतिहास व संस्कृतीची माहिती होईल असे त्यांनी सांगितले.