शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काश्मिरात शाळा जाळल्या

By admin | Updated: October 26, 2016 02:04 IST

काश्मिरात गेल्या २४ तासांत अज्ञात लोकांनी तीन शाळा जाळल्या. या घटनांनी खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शाळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था आवळण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर : काश्मिरात गेल्या २४ तासांत अज्ञात लोकांनी तीन शाळा जाळल्या. या घटनांनी खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शाळांभोवतीची सुरक्षाव्यवस्था आवळण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या नूरबाग भागातील शाळेला अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी पहाटे आग लावली. मात्र, अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. आग आणि अग्निशमन कार्य यामुळे शाळेच्या इमारतीची हानी झाली, असेही हा अधिकारी म्हणाला. दुसऱ्या एका घटनेत समाजकंटकांनी अनंतनाग जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा जाळण्याचा प्रयत्न केला. तथापि, अग्निशमन जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे शाळा भस्मसात होण्यापासून वाचली. आगीमुळे एका खिडकीचे नुकसान झाले. बांदीपुरा जिल्ह्यातील सद्रुकोटे बाला येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या इमारतीत सोमवारी रात्री आग भडकली. अग्निशमन दलांनी आगीवर नियंत्रण मिळवून मोठी हानी रोखली. या घटनेमागे समाजकंटकांचा हात असल्याचा संशय आहे. जाळपोळीच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शाळांच्या इमारतीभोवतीची गस्त वाढविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)बोर्डाची परीक्षा पुढील महिन्यातराज्यातील शाळा जुलैपासून बंद असूनही राज्य सरकारने वार्षिक बोर्ड परीक्षा पुढच्या महिन्यात घेण्याची घोषणा केली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वनी सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत मारला गेल्यापासून खोऱ्यातील शाळा बंद आहेत. परीक्षा घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली. यशवंत सिन्हा यांनी केली गिलानींशी चर्चा श्रीनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय शिष्टमंडळाने मंगळवारी कट्टरपंथी हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्याशी श्रीनगरमध्ये चर्चा केली. काश्मिरात जुलैमध्ये हिज्बुलचा अतिरेकी बुऱ्हाण वानी मारला गेल्यानंतर राज्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेली कोंडी संपविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचा पलटवार; पाकचे तीन ठारजम्मू : काश्मीर खोऱ्यातील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील नियंत्रण रेषेलगत शस्त्रबंदीचे उल्लंघन करून पाकिस्तानी फौजांनी उखळी तोफांच्या माऱ्यासोबत बॉम्ब डागत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सीमेवर सजग असलेल्या भारतीय जवानांनी तात्काळ केलेल्या पलटवारात पाकिस्तानचे २ ते ३ सैनिक ठार झाले. आर.एस. पुरा भागात सीमेपलीकडून करण्यात आलेल्या तोफमाऱ्यात एकाच कुटुंबातील सहा महिला जखमी झाल्या आहेत. नौशेरा भागात सकाळी १० वाजेपासून दोन्ही बाजूंनी सुरू झालेली चकमक अजूनही चालू आहे. पाकिस्तानच्या बाजूने करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही तात्काळ तडाखेबाज उत्तर दिले. पाकच्या उलट्या बोंबाइस्लामाबाद : भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. पाकने भारताच्या इस्लामाबादेतील उप उच्चायुक्तांना पाचारण करून ताबा रेषेवर भारताने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत निषेध नोंदविला. भारतीय सुरक्षा दलांनी २३ आणि २४ आॅक्टोबर रोजी केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एका बालिकेसह दोन ठार, तर सहा जण जखमी झाले होते. याबाबत आम्ही भारताकडे तीव्र निषेध नोंदविला, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. ‘शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप द्यावे’नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर जवळपास दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप देण्याची गरज असल्याचे मत मांडले. येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दोन्ही देशांनी २००३ च्या शस्त्रसंधी कराराला औपचारिक स्वरूप द्यावे.