शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शाळा देणार प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्यांनी घरुन उत्तरपत्रिका आणावी'; परिक्षबाबत या राज्याचा अजब आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:54 IST

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत.

आपल्याकडे परिक्षेवेळी शाळांमध्ये प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिका दिली जाते, अशी पद्धत सर्वच शाळांमध्ये सुरू आहे. पण आता कर्नाटक राज्य सरकारने परिक्षांबाबत एक वेगळाच निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने याबाबत पूर्णपणे वेगळा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इयत्ता 5वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घरून उत्तरपत्रिका आणावी लागणार आहे.

कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व शाळांना परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका स्वत: आणण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ब्लॉक स्तरावर करण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे.

"संदेशखालीत जे घडले त्याने कुणाचीही मान शरमेने खाली जाईल, पण TMC सरकारला..."

या सूचना इयत्ता 5, 8, 9 साठी आहेत. मात्र, कर्नाटक सरकारच्या या निर्णयामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. कर्नाटक राज्य परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाला परीक्षा आयोजित करण्याचा अधिकार आहे. यापूर्वी 11 ते 18 मार्च दरम्यान परीक्षा होणार होती. पण उच्च न्यायालयाने सोमवार ११ तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा इयत्ता 5वी आणि 8वीच्या सार्वजनिक/बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. याशिवाय इयत्ता 9वी आणि 11वीच्या सार्वजनिक परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

विभागाने 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांना मोफत उत्तरपुस्तिका आणि प्रश्नपत्रिका देऊन परीक्षा आयोजित केली होती. त्यानंतर यंदाही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्यात येणार असल्याची माहिती विभागाने दिली होती, मात्र परीक्षेपूर्वीच विभागाने आपल्या घोषणेवरून यू-टर्न घेत आता उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देणार असल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका आणि माहिती लिहिण्यासाठी एक पत्रक दिले जाईल. गेल्या आठवड्यात एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये केएसईएबीने सर्व हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना त्यांच्या उत्तरपत्रिका आणण्याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. केएसईएबी'ने त्यांच्या वेबसाइटवर पुस्तिकेच्या स्वरूपात मॉडेल प्रश्नपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत.

या निर्णयानंतर भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनी सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिले, 'कर्नाटकला दिवाळखोरीत ढकलणारे काँग्रेस सरकार आता विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका आणण्यास भाग पाडत आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी स्वतःच्या उत्तरपत्रिका. हे सरकार पूर्ण गडबडले आहे आणि त्यांनी पदाची प्रतिष्ठा गमावली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने निधी उधार घेऊन तो शिक्षण विभागाला द्यावा आणि उत्तरपत्रिका छापल्या जातील याची खात्री करावी, अशी विनंती. सरकारच्या दूरदृष्टी आणि नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थी समाजावर दबाव येऊ नये, असंही ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षाKarnatakकर्नाटक