शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा सुरू होणार, 'या' 10 गोष्टींचं पालन करावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 14:15 IST

कोरोना विषाणूमुळे 16 मार्च रोजी शाळा व महाविद्यालये यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या.

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे शाळा,  कॉलेज बंद आहेत. पण मोदी सरकारनं आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत 21 सप्टेंबरपासून नववी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी मोदी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळेत जाऊ शकतील. कोरोना विषाणूमुळे 16 मार्च रोजी शाळा व महाविद्यालये यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या.21 सप्टेंबरपासून शाळा 9 ते 12वी पर्यंत सुरू होतीलकेंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच एसओपी जारी केली आहे. याअंतर्गत केवळ 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थीच शाळेत जाऊन शिकू शकतील. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे लागणार  आहे. 50 टक्के शिक्षक शाळेत येणारकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाऊ शकते. ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल.संपूर्ण खबरदारी घेतली जाणारशाळांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने खबरदारीदेखील घ्यावी लागेल. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटरची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी करावे लागेल. याशिवाय त्यांचे हातही स्वच्छ करावे लागतात. शिक्षक व इतर कर्मचार्‍यांना शाळेमार्फत फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्स देण्यात येतील. शाळा दररोज उघडण्यापूर्वी संपूर्ण परिसर, सर्व वर्ग, प्रॅक्टिकल लॅब आणि बाथरूम सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनद्वारे स्वच्छ केले जातील.'या' भागातील विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीतकंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शालेय कर्मचारी यांच्या आगमनावर निर्बंध.वृद्ध, आजारी आणि गर्भवती महिला शाळेपासून दूर राहतील.जर कोणाला थर्मल स्कॅनिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय आला असेल, तर त्याला वेगळे केले जाईल आणि आरोग्य विभाग, पालकांना त्याबद्दल कळविले जाईल.

'या' गोष्टींचं पालन करावं लागणारबंद खोल्यांऐवजी वर्ग खुल्या जागेत घेतले जाऊ शकतात.शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी यांना कमीत कमी 6 फूट अंतर ठेवावे लागेल.सामाजिक अंतरासाठी जमिनीवर सहा फूटांच्या खुणा असतील.प्रत्येक वर्गाच्या अभ्यासासाठी वेगळा वेळ ठरविला जाईल.विद्यार्थी कॉपी, पुस्तक, पेन्सिल, पेन, पाण्याची बाटली यांसारख्या गोष्टी एक-दुसऱ्याला देऊ शकणार नाहीत.विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांना सतत हात धुवावे लागतील. तसेच फेस मास्क घालावा लागेल.शाळांमध्ये सकाळची प्रार्थना करण्यास परवानगी दिली जाणार नाही.जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील.शाळेतील कॅन्टीन बंद राहतीलव्यावहारिक प्रयोगशाळेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमधील अंतर ठेवण्यासाठी लहान संख्येने बॅच बनविल्या जातील. प्रयोगशाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 4 चौरस मीटर गोलाकार काढला जाईल.

टॅग्स :Schoolशाळा