शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोण त्रास देतोय, फक्त एक फोन करा!; केंद्र सरकारच्या महिला सुरक्षेसाठी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 06:50 IST

केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या योजना सुरू आहेत .

चंद्रकांत दडस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या योजना सुरू आहेत ते जाणून घेऊ...

केंद्र सरकार महिलांना देतेय ‘शक्ती’

१,१७९.७२ कोटी रुपये महिला सुरक्षा योजनांसाठी मंजूर

८८५.४९ कोटी रुपये गृह मंत्रालय त्यांच्या बजेटमधून देणार

२९४.२३  कोटी रुपये निर्भया निधीतून देण्यात येत आहेत.

योजना कधी सुरू झाली?

२०२१-२२ पासून ही योजना चालविली जात आहे. महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण या उद्देशाने सर्वंकष योजना म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. याला ‘शक्ती अभियान’ असेही म्हटले जाते.

योजना कोणत्या?

११२ इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट

नॅशनल फॉरेन्सिक डेटा सेंटरच्या स्थापनेसह प्रयोगशाळांचे अपग्रेडेशन

लॅबोरेटरीजमध्ये डीएनए विश्लेषण, सायबर फॉरेन्सिक क्षमता मजबूत करणे

सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध

अत्याचाराचा सामना करण्यासाठी तपासनीस आणि अभियोक्ता यांची क्षमता-निर्मिती आणि प्रशिक्षण

महिला हेल्प डेस्क आणि मानव तस्करी विरोधी युनिट्स

पोलिसांना करा बिनधास्त फोन

पोलिस ठाण्यांमध्ये महिला हेल्प डेस्क

पोलिसांना दरवर्षी महिला,  बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पोलिस ठाण्यांमध्येही महिला हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहेत.

मानवी तस्करी विरोधी युनिटची स्थापना करण्यात आली.

उद्देश काय?

महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण करणे

महिलांवर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडविणे

हक्क मिळवून देणे

राष्ट्र उभारणीत समान भागीदार देणे

महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधण्याची कटिबद्धता

आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे

मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी देणे

कौशल्य विकास, क्षमता निर्मिती, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्ज मिळण्यातील अडचणी दूर करणे