शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

टंचाई उपाययोजनांना बे्रक

By admin | Updated: September 3, 2014 23:57 IST

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुदतवाढी अभावी टँकरलाही बे्रक लागला आहे़ त्यामुळे वाड्या-वस्त्यांना टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़नगर शहरासह जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ जिल्ह्यात साधारणपणे जिल्ह्यात सात जूनला पाऊस येतो़ परंतु जून महिन्यात पाऊस झाला नाही़ त्यामुळे राज्य शासनाने उन्हाळ्यातील टंचाईबाबतच्या सर्व उपाययोजनांना जूनपर्यंत मुदतवाढ दिली़ टँकरही सुरू करण्यात आले़ जून कोरडा गेला़ त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली़ दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाल्याने टँकरमध्ये वाढ करण्यात आली़ खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पाणी कपात करण्यात आली़ जून महिन्यात पाऊस न झाल्याने जुलैमध्ये टँकरचा आकडा ३६९ वर पोहोचला़ जुलेही कोरडाच गेला़ त्यामुळे टंचाई उपाययोजनांना पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला़ आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले़ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ आठवडाभर जोरदार पाऊस झाला़ जिल्ह्यात अत्तापर्यंत ६५ टक्के पाऊस झाला आहे़ सर्वदूर पाऊस झाल्याने टँकरची मागणी कमी झाली असून, आॅगस्टअखेरीस १४९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़ टँकरच्या संख्येत कमालीची घट झाली़ जिल्हा प्रशासनाने १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद केले असून, जिल्हा भरातून अहवाल येणेही बंद झाले आहे़ तसेच इतर उपाययोजनाही बंद करण्यात आल्या आहेत़जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते़ ते नुकत्याच झालेल्या पावसामुळे दूर झाले़ यापूर्वी टंचाई उपाययोजनांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली़ उपाययोजनांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली़ आॅगस्ट महिना संपूनही जिल्हा प्रशासनास मुदतवाढीबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत़ परिणामी टंचाई उपाययोजना आपोआप बंद झाल्या आहेत़ त्यामुळे वाड्या -वस्त्यांना टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे़ मुदतवाढी अभावी टंचाईबाबतच्या उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत़ टंचाईबाबतच्या उपाययोजनांच्या मुदतवाढीस परवानगी मिळाल्यास त्या सुरू ठेवण्यात येतील़ परंतु पाऊस झाल्याने टँकरची मागणी होणार नाही आणि टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही,असे चित्र सध्या तरी आहे़ (प्रतिनिधी)