शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

टंचाई उपाययोजनांना बे्रक

By admin | Updated: September 3, 2014 23:57 IST

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुदतवाढी अभावी टँकरलाही बे्रक लागला आहे़ त्यामुळे वाड्या-वस्त्यांना टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़नगर शहरासह जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ जिल्ह्यात साधारणपणे जिल्ह्यात सात जूनला पाऊस येतो़ परंतु जून महिन्यात पाऊस झाला नाही़ त्यामुळे राज्य शासनाने उन्हाळ्यातील टंचाईबाबतच्या सर्व उपाययोजनांना जूनपर्यंत मुदतवाढ दिली़ टँकरही सुरू करण्यात आले़ जून कोरडा गेला़ त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली़ दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाल्याने टँकरमध्ये वाढ करण्यात आली़ खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पाणी कपात करण्यात आली़ जून महिन्यात पाऊस न झाल्याने जुलैमध्ये टँकरचा आकडा ३६९ वर पोहोचला़ जुलेही कोरडाच गेला़ त्यामुळे टंचाई उपाययोजनांना पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला़ आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले़ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ आठवडाभर जोरदार पाऊस झाला़ जिल्ह्यात अत्तापर्यंत ६५ टक्के पाऊस झाला आहे़ सर्वदूर पाऊस झाल्याने टँकरची मागणी कमी झाली असून, आॅगस्टअखेरीस १४९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़ टँकरच्या संख्येत कमालीची घट झाली़ जिल्हा प्रशासनाने १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद केले असून, जिल्हा भरातून अहवाल येणेही बंद झाले आहे़ तसेच इतर उपाययोजनाही बंद करण्यात आल्या आहेत़जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते़ ते नुकत्याच झालेल्या पावसामुळे दूर झाले़ यापूर्वी टंचाई उपाययोजनांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली़ उपाययोजनांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली़ आॅगस्ट महिना संपूनही जिल्हा प्रशासनास मुदतवाढीबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत़ परिणामी टंचाई उपाययोजना आपोआप बंद झाल्या आहेत़ त्यामुळे वाड्या -वस्त्यांना टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे़ मुदतवाढी अभावी टंचाईबाबतच्या उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत़ टंचाईबाबतच्या उपाययोजनांच्या मुदतवाढीस परवानगी मिळाल्यास त्या सुरू ठेवण्यात येतील़ परंतु पाऊस झाल्याने टँकरची मागणी होणार नाही आणि टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही,असे चित्र सध्या तरी आहे़ (प्रतिनिधी)