शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई उपाययोजनांना बे्रक

By admin | Updated: September 3, 2014 23:57 IST

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

अहमदनगर: नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्हा टंचाईमुक्त झाला आहे़ जिल्ह्यातील टंचाईच्या उपाययोजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुदतवाढी अभावी टँकरलाही बे्रक लागला आहे़ त्यामुळे वाड्या-वस्त्यांना टँकरने होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़नगर शहरासह जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविली होती़ जिल्ह्यात साधारणपणे जिल्ह्यात सात जूनला पाऊस येतो़ परंतु जून महिन्यात पाऊस झाला नाही़ त्यामुळे राज्य शासनाने उन्हाळ्यातील टंचाईबाबतच्या सर्व उपाययोजनांना जूनपर्यंत मुदतवाढ दिली़ टँकरही सुरू करण्यात आले़ जून कोरडा गेला़ त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली़ दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाल्याने टँकरमध्ये वाढ करण्यात आली़ खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी पाणी कपात करण्यात आली़ जून महिन्यात पाऊस न झाल्याने जुलैमध्ये टँकरचा आकडा ३६९ वर पोहोचला़ जुलेही कोरडाच गेला़ त्यामुळे टंचाई उपाययोजनांना पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला़ आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले़ जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली़ आठवडाभर जोरदार पाऊस झाला़ जिल्ह्यात अत्तापर्यंत ६५ टक्के पाऊस झाला आहे़ सर्वदूर पाऊस झाल्याने टँकरची मागणी कमी झाली असून, आॅगस्टअखेरीस १४९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता़ टँकरच्या संख्येत कमालीची घट झाली़ जिल्हा प्रशासनाने १ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील सर्व टँकर बंद केले असून, जिल्हा भरातून अहवाल येणेही बंद झाले आहे़ तसेच इतर उपाययोजनाही बंद करण्यात आल्या आहेत़जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते़ ते नुकत्याच झालेल्या पावसामुळे दूर झाले़ यापूर्वी टंचाई उपाययोजनांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली़ उपाययोजनांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली़ आॅगस्ट महिना संपूनही जिल्हा प्रशासनास मुदतवाढीबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत़ परिणामी टंचाई उपाययोजना आपोआप बंद झाल्या आहेत़ त्यामुळे वाड्या -वस्त्यांना टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे़ मुदतवाढी अभावी टंचाईबाबतच्या उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत़ टंचाईबाबतच्या उपाययोजनांच्या मुदतवाढीस परवानगी मिळाल्यास त्या सुरू ठेवण्यात येतील़ परंतु पाऊस झाल्याने टँकरची मागणी होणार नाही आणि टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासणार नाही,असे चित्र सध्या तरी आहे़ (प्रतिनिधी)