शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

सांगा, काँग्रेस कशी होईल बळकट?

By admin | Updated: November 2, 2014 01:29 IST

निवडणुकीतील सततच्या पराभवाने त्रस्त झालेल्या काँग्रेसला आता पक्ष संघटन बळकट करण्याची चिंता सतावत आहे. परिणामी, पक्ष संघटन बळकट कसे करता येईल,

राहुल गांधींची वरिष्ठ नेत्यांना विचारणा : मोदींना टक्कर देण्यासाठी आक्रमक बनण्याचा सल्ला
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
निवडणुकीतील सततच्या पराभवाने त्रस्त झालेल्या काँग्रेसला आता पक्ष संघटन बळकट करण्याची चिंता सतावत आहे. परिणामी, पक्ष संघटन बळकट कसे करता येईल, असा प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारत आहेत. मागील एक आठवडय़ापासून राहुल गांधी वेगवेगळ्या नेत्यांना बोलावून पक्ष संघटना बळकट बनविण्याबाबत त्यांचे मत जाणून घेत आहेत.
जोर्पयत बंद खोलीत बसणा:या नेत्यांना बाजूला सारले जात नाही तोर्पयत मोदींशी मुकाबला केला जाऊ शकत नाही. कारण मोदी खोटे बोलण्यात आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये निपुण आहेत. त्यांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला अधिक आक्रमक बनून रस्त्यावर यावे लागेल, असे पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना स्पष्टपणो सांगितल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रंनी दिली.
पक्ष संघटनेच्या प्रत्येक स्तरावर निवडणुका घेण्याची राहुल गांधी यांची योजना आहे. परंतु पक्षाच्या एका सरचिटणीसाने त्यांची ही योजनाच खारीज केल्याचे समजते. या सरचिटणीसाने कार्य समितीच्या निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले आणि समितीचे                     सदस्य पक्षाध्यक्षांनीच नामनियुक्त करण्याची वकिली केल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांनी आतार्पयत ज्या नेत्यांसोबत पक्ष बळकटीबाबत विचारविमर्श केलेला आहे, त्यात अहमद पटेल, सुशीलकुमार शिंदे, जनार्दन द्विवेदी, मणिशंकर अय्यर, सचिन पायलट, गिरिजा व्यास, अंबिका सोनी, मीनाक्षी नटराजन, अजय माकन, जे.डी. सीलम, मुकुल वासनिक, अमरिंदर सिंग, जयपाल रेड्डी आदींचा समावेश आहे. 
राहुल गांधी यांनी स्वत: पक्षनेत्यांची यादी तयार केली आहे आणि ते प्रत्येकाला स्वत: फोन करून भेटण्यास सांगत आहेत. कालपरवार्पयत जे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करीत होते, त्याच नेत्यांना राहुल गांधी आता स्वत: चर्चेसाठी बोलावून घेत आहेत.
 
च्पक्षाच्या सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी युवा      टीमला सोबत घेऊन पक्ष चालविण्याचा विचारही तूर्तास बाजूला सारला आहे आणि आता ते पक्षाच्या ज्येष्ठ व जुन्याजाणत्या नेत्यांना सोबत घेऊन चालण्याच्या तयारीला लागले आहेत. राहुल गांधी यांनी या नेत्यांशी चर्चा केली त्यावेळी पक्षांतर्गत लाथाळ्याचा मुद्दाही उपस्थित केला गेला.
च्पक्षाचे नेते 24, अकबर मार्ग येथे बसून आपसातच राजकारण खेळतात, त्यामुळे पक्ष सर्व स्तरावर प्रभावित होत आहे, अशी तक्रार काही   नेत्यांनी केली. पक्ष संघटनेत तत्काळ मोठा फेरबदल करण्याची मागणी काही नेत्यांनी या चर्चेदरम्यान केली. राहुल गांधी यांच्याशी सुरू असलेल्या या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये व्यापक फेरबदल होण्याची शक्यता आहे.