शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

"इंदिरा गांधींची सत्ता गेली, एक दिवस नरेंद्र मोदीही जातील, त्यामुळे परिस्थिती बिघडवू नका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 08:56 IST

Satya Pal Malik : सत्यपाल मलिक यांनी सैनिक भरतीसाठी राबविल्या जाणाऱ्या 'अग्निपथ' योजनेवरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे समजून घेतले पाहिजे की सत्ता कायमस्वरूपी नसते आणि ती येत-जात असते, असे मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी रविवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना सत्यपाल मलिक म्हणाले की, "मोदीजींनी हे समजून घेतले पाहिजे की सत्तेची पॉवर येते आणि जाते. इंदिरा गांधी यांचीही सत्ता गेली. तेव्हा लोक म्हणायचे की त्यांना कोणीही हटवू शकत नाही. एक दिवस तुम्हीही निघून जाल, त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडवू नका की, ती सुधारता येणार नाही."

सत्यपाल मलिक रविवारी जयपूरमध्ये राजस्थान युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनच्या (RUSU) कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, "देशात अनेक प्रकारच्या लढाया सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यास केंद्र सरकारच्या विरोधात युवकही मोर्चा काढतील." यासोबतच, सत्यपाल मलिक यांनी सैनिक भरतीसाठी राबविल्या जाणाऱ्या 'अग्निपथ' योजनेवरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या योजनेमुळे सैन्य कमकुवत होऊ शकते आणि केवळ तीन वर्षे सेवा बजावताना सैनिकांमध्ये त्यागाची भावना राहणार नाही, असे ते म्हणाले. 

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, जितके आपल्या माहिती आहे. त्यानुसार अग्निवीर सैनिकांना ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रांना आणि शस्त्रांना स्पर्श करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे 'अग्निपथ' योजनेमुळे लष्कराचीही नासधूस होत आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. दरम्यान, सत्यपाल मलिक ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्या कार्यक्रमात निर्मल चौधरी यांनी राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी