शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

ज्योतिषांच्या भविष्यावर शनी वक्री

By admin | Updated: May 17, 2014 21:50 IST

अस्थिर सरकारमुळे मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील अशा प्रकारची भाकिते करणार्‍या ज्योतिषांची वाणीच मतदारांनी बंद केल्याचे चित्र देशात पहायला मिळत आहे.

मोदींनी ठरविली ज्योतिषवाणी खोटी, लाटेत वाहून गेले ग्रह-तार्‍यांचे अडथळे पुणे : लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, देशाचे सरकार त्रिशंकु असेल, मोदी पंतप्रधान होणार नाहीत इथपासून ते नवे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर येईल, अस्थिर सरकारमुळे मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील अशा प्रकारची भाकिते करणार्‍या ज्योतिषांची वाणीच मतदारांनी बंद केल्याचे चित्र देशात पहायला मिळत आहे. लोकसभेच्या मतदानापुर्वी व काही टप्प्यांचे मतदान सुरु झाल्यानंतर राज्यातील विविध भविष्यवेत्त्यांनी लोकसभेची कुंडली मांडली होती. त्यानुसार मोदी यांचे ग्रहमान चांगले नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. थोडक्यात मोदी पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचे भाकित वर्तविण्यात आले होते. भाजपने जरी सर्वाधिक जागा मिळविल्या तरी त्यांना मित्र पक्षांच्या सहाय्यानेच सरकार स्थापन करावे लागले. येणारे सरकार कॉंग्रेसच्या पाठिंब्यावरच येईल. त्रिशंकु सरकार असल्याने दोन-तीन वर्षांत देशाला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसचे स्थिर सरकार येईल. देशात झालेल्या मतदानाचे विविध टप्पे, कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच ज्येष्ठ नेत्यांची व देशाचे ग्रहमान पाहून असे अंदाज वर्तविण्यात आले होते. विविध भविष्यवेत्त्यांच्या अंदाजात परस्पर विरोधाभास असला तरी देशाचे सरकार त्रिशंकु असेल, त्यामुळेच मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे काही समान मुद्दे त्यात होते. ज्योतिषांच्या भविष्यानुसार भाजपला १५० ते २२५, कॉंग्रेसला ११५ ते १२५, बहुजन समाज पक्ष १६ ते १८, समाजवादी पक्ष १८ ते २०, जनतादल युनायटेड १६ ते १८ अशा पक्षांच्या संभाव्य जागांचे अंदाज देण्यात आले होते. राज्यात कॉंग्रेसला १२ ते १४, राष्ट्रवादी ८ ते १०, भाजप १२ ते १४, शिवसेना १० ते १२ अशी जागांची संख्या देण्यात आली होती. तसेच या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खाते उघडेल असे देखील सांगण्यात आले होते. मात्र भविष्यवेत्त्यां्चे सर्व अंदाज मतदार राजाने फोल ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे.