शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शनिवार ठरला घातवार

By admin | Updated: June 14, 2015 02:29 IST

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले

राजमुंदरी/एटा/लुधियाना : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले असून, भाविकांसह इतर प्रवाशांसाठी हा घातवार ठरला आहे.आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दौलतेश्वरम येथे देवदर्शनावरून परतणारी एक व्हॅन सकाळी पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने ७ मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला. तिरुपतीला दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सर्व भाविक विशाखापट्टणमजवळील अच्युतापुरम येथील रहिवासी होते. या अपघातातून केवळ एक बालक बचावला असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वाहन रेलिंगवर आदळले आणि रेलिंग तुटल्यामुळे ते नदीच्या पात्रात कोसळले. मृतांमध्ये आठ महिला आणि चालकासह सात पुरुषांचा समावेश आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)१९ भाविकांवर काळाचा घाला1) उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील पुरा गावात ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण टक्कर होऊन किमान १९ जण ठार तर ३३ जखमी झाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. 2 )वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, मलावन पोलीस स्टेशनअंतर्गत पुरा गावात भागवत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून भाविक थोड्या अंतरावरील धरणावर पाणी भरण्यासाठी जात होते. मार्गात एका ट्रकने मागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या धडकेने ही ट्रॉली पुढील दुसऱ्या ट्रॉलीवर चढली. वायुगळतीने ५ मृत्युमुखीलुधियाना (पंजाब): अमोनिया वायू वाहून नेणारा एक टँकर पहाटे येथून २५ कि.मी. अंतरावरील उड्डाणपुलाखाली जाऊन अडकल्यानंतर झालेल्या वायुगळतीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० गावकऱ्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर विषारी वायू दोराहा गाव आणि आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरला, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.