शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

शनिवार ठरला घातवार

By admin | Updated: June 14, 2015 02:29 IST

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले

राजमुंदरी/एटा/लुधियाना : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले असून, भाविकांसह इतर प्रवाशांसाठी हा घातवार ठरला आहे.आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दौलतेश्वरम येथे देवदर्शनावरून परतणारी एक व्हॅन सकाळी पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने ७ मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला. तिरुपतीला दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सर्व भाविक विशाखापट्टणमजवळील अच्युतापुरम येथील रहिवासी होते. या अपघातातून केवळ एक बालक बचावला असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वाहन रेलिंगवर आदळले आणि रेलिंग तुटल्यामुळे ते नदीच्या पात्रात कोसळले. मृतांमध्ये आठ महिला आणि चालकासह सात पुरुषांचा समावेश आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)१९ भाविकांवर काळाचा घाला1) उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील पुरा गावात ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण टक्कर होऊन किमान १९ जण ठार तर ३३ जखमी झाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. 2 )वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, मलावन पोलीस स्टेशनअंतर्गत पुरा गावात भागवत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून भाविक थोड्या अंतरावरील धरणावर पाणी भरण्यासाठी जात होते. मार्गात एका ट्रकने मागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या धडकेने ही ट्रॉली पुढील दुसऱ्या ट्रॉलीवर चढली. वायुगळतीने ५ मृत्युमुखीलुधियाना (पंजाब): अमोनिया वायू वाहून नेणारा एक टँकर पहाटे येथून २५ कि.मी. अंतरावरील उड्डाणपुलाखाली जाऊन अडकल्यानंतर झालेल्या वायुगळतीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० गावकऱ्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर विषारी वायू दोराहा गाव आणि आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरला, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.