शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

शनिवार ठरला घातवार

By admin | Updated: June 14, 2015 02:29 IST

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले

राजमुंदरी/एटा/लुधियाना : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले असून, भाविकांसह इतर प्रवाशांसाठी हा घातवार ठरला आहे.आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दौलतेश्वरम येथे देवदर्शनावरून परतणारी एक व्हॅन सकाळी पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने ७ मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला. तिरुपतीला दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सर्व भाविक विशाखापट्टणमजवळील अच्युतापुरम येथील रहिवासी होते. या अपघातातून केवळ एक बालक बचावला असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वाहन रेलिंगवर आदळले आणि रेलिंग तुटल्यामुळे ते नदीच्या पात्रात कोसळले. मृतांमध्ये आठ महिला आणि चालकासह सात पुरुषांचा समावेश आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)१९ भाविकांवर काळाचा घाला1) उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील पुरा गावात ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण टक्कर होऊन किमान १९ जण ठार तर ३३ जखमी झाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. 2 )वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, मलावन पोलीस स्टेशनअंतर्गत पुरा गावात भागवत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून भाविक थोड्या अंतरावरील धरणावर पाणी भरण्यासाठी जात होते. मार्गात एका ट्रकने मागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या धडकेने ही ट्रॉली पुढील दुसऱ्या ट्रॉलीवर चढली. वायुगळतीने ५ मृत्युमुखीलुधियाना (पंजाब): अमोनिया वायू वाहून नेणारा एक टँकर पहाटे येथून २५ कि.मी. अंतरावरील उड्डाणपुलाखाली जाऊन अडकल्यानंतर झालेल्या वायुगळतीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० गावकऱ्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर विषारी वायू दोराहा गाव आणि आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरला, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.