शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार ठरला घातवार

By admin | Updated: June 14, 2015 02:29 IST

आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले

राजमुंदरी/एटा/लुधियाना : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले असून, भाविकांसह इतर प्रवाशांसाठी हा घातवार ठरला आहे.आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दौलतेश्वरम येथे देवदर्शनावरून परतणारी एक व्हॅन सकाळी पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने ७ मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला. तिरुपतीला दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सर्व भाविक विशाखापट्टणमजवळील अच्युतापुरम येथील रहिवासी होते. या अपघातातून केवळ एक बालक बचावला असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वाहन रेलिंगवर आदळले आणि रेलिंग तुटल्यामुळे ते नदीच्या पात्रात कोसळले. मृतांमध्ये आठ महिला आणि चालकासह सात पुरुषांचा समावेश आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)१९ भाविकांवर काळाचा घाला1) उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील पुरा गावात ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण टक्कर होऊन किमान १९ जण ठार तर ३३ जखमी झाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. 2 )वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, मलावन पोलीस स्टेशनअंतर्गत पुरा गावात भागवत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून भाविक थोड्या अंतरावरील धरणावर पाणी भरण्यासाठी जात होते. मार्गात एका ट्रकने मागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या धडकेने ही ट्रॉली पुढील दुसऱ्या ट्रॉलीवर चढली. वायुगळतीने ५ मृत्युमुखीलुधियाना (पंजाब): अमोनिया वायू वाहून नेणारा एक टँकर पहाटे येथून २५ कि.मी. अंतरावरील उड्डाणपुलाखाली जाऊन अडकल्यानंतर झालेल्या वायुगळतीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० गावकऱ्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर विषारी वायू दोराहा गाव आणि आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरला, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.