शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सीमा ओलांडल्या पण व्हिसा मिळेना, पाकिस्तानातील वधूची सुषमा स्वराजांकडे धाव

By admin | Updated: July 4, 2017 13:55 IST

कराचीमधील सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांचं एकमेकांशी सूत जुळलं असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - पाकिस्तानमधील तरुणी आणि भारतातील तरुण यांच्या प्रेमाचं रुपांतर लग्नात होण्यासाठी सर्व तयारी झाली आहे, फक्त गरज आहे ती व्हिसाची. कराचीमधील सादिया आणि लखनऊमधील सय्यद यांचं एकमेकांशी सूत जुळलं असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सीमा ओलांडणारं त्याचं प्रेम व्हिसामुळे अडकलं आहे. 1 ऑगस्टला दोघं विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांचं राष्ट्रीयत्व प्रेमाच्या आड येत आहे. सादियाला व्हिसा मिळत नसल्याने अखेर तिने केंद्रीय परराष्ट मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे धाव घेतली असून मदत मागितली आहे. 
(सुषमा स्वराज यांच्यामुळे पाकिस्तानी वधू पोहोचली भारतात)
 
सादिया आणि सय्यदने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सादियाच्या कुटुंबियांनी व्हिसासाठी इस्लामाबादमधील भारतीय उच्च आयोगाकडे अर्ज केला. मात्र त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. "माझा अर्ज दोन वेळा नाकारण्यात आला. अर्ज नाकारण्याचं कारणही सांगण्यात आलं नाही. आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एक वर्षापासून आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत", अशी माहिती सादियाने दिली आहे. 
 
उरी हल्ल्यापासून ते कुलभूषण जाधवपर्यंत अनेक मुद्द्यांवर भारत पाकिस्तानमध्ये वाद सुरु असून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध खराब झाल्यानेच आम्हाला व्हिसा मिळत नसल्याचा दावा सादियाने केला आहे. नेहमी ट्विटरच्या माध्यमातून समस्या सोडवणा-या सुषमा स्वराज यांच्याकडे सादियाने मदत मागितली आहे. "तुमच्या या मुलीची मदत करता. फक्त तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहिली आहे", असं ट्विट सादियाने सुषमा स्वराज यांना केलं आहे. 
 
2012 मध्ये जेव्हा सादियाचं कुटुंब लखनऊमध्ये आलं होतं, तेव्हाच दोघांचं लग्न ठरवण्यात आलं. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांनी पुढील चर्चा फोनवरुनच केली. मात्र लग्नामध्ये इतके विघ्न येतील यांची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. सय्यद यानेदेखील सुषमा स्वराजांकडे मदत मागितली असून सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.