शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

जिवंत पाणीसाठा २,७०० द.ल.घ.मी. : मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर, इंदिरा सागर धरणातील विसर्गाचा लाभ

अहमदाबाद : गुजरातमध्ये मान्सूनचे आगमन नुकतेच झाले असले तरी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आता धरणात १२७.४६ मीटर पाणी असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११ मीटर बाकी आहे.सरदार सरोवराच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे. विशेषत: मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून खाली पाणी येत आहे. आता धरणातील जिवंत पाणीसाठा २,७०० दशलक्ष घनमीटर झाला आहे.सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे संचालक पी. सी. व्यास यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची पातळी १२७.४६ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११.२२ मीटरच बाकी आहे. धरणाची एकूण पाणीधारण उंची १३८.६८ मीटर आहे.गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित असलेल्या सरदार सरोवर धरणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण १३८.६८ मीटर क्षमतेने पाणी आले होते. २०१७ मध्ये उंची वाढविली गेल्यापासून पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.सोडलेले पाणी कोरड्या तलावातव्यास यांनी सांगितले की, वीज निर्मिती केंद्रांतून सोडले जाणारे पाणी धरणाखालील भागातील कोरडे तलाव भरण्यासाठी तसेच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरजही या पाण्यातून भागविली जात आहे.सूत्रांनी सांगितले की, अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे यंदा जूनमध्येच धोऽऽ धो पाऊस पडला आहे. सरदार सरोवराच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे सरोवरात चांगले पाणी आले आहे.वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरूव्यास यांनी सांगितले की, सध्या धरणात ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. नदीपात्रातील तसेच कालव्याच्या तोंडाशी अशा दोन्ही ठिकाणची वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू करण्यात आली आहेत. नदीपात्रातील वीज निर्मिती केंद्रात १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या दोन वीज निर्मिती केंद्रांत १०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. वीज निर्मिती केंद्रांद्वारे ७ हजार क्युसेक्स पाणी नर्मदा मुख्य कालव्यात सोडले जात आहे. तसेच ३३,००० क्युसेक्स पाणी नर्मदा नदीपात्रात सोडले जात आहे.व्यास यांनी सांगितले की, नदीपात्र आणि कालवा मुख या दोन्ही ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांतून सध्या दररोज १७ ते २० दशलक्ष युनिट वीज निर्माण होत आहे. या विजेची दररोजची किंमत ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये आहे.