शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

जिवंत पाणीसाठा २,७०० द.ल.घ.मी. : मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर, इंदिरा सागर धरणातील विसर्गाचा लाभ

अहमदाबाद : गुजरातमध्ये मान्सूनचे आगमन नुकतेच झाले असले तरी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आता धरणात १२७.४६ मीटर पाणी असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११ मीटर बाकी आहे.सरदार सरोवराच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे. विशेषत: मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून खाली पाणी येत आहे. आता धरणातील जिवंत पाणीसाठा २,७०० दशलक्ष घनमीटर झाला आहे.सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे संचालक पी. सी. व्यास यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची पातळी १२७.४६ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११.२२ मीटरच बाकी आहे. धरणाची एकूण पाणीधारण उंची १३८.६८ मीटर आहे.गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित असलेल्या सरदार सरोवर धरणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण १३८.६८ मीटर क्षमतेने पाणी आले होते. २०१७ मध्ये उंची वाढविली गेल्यापासून पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.सोडलेले पाणी कोरड्या तलावातव्यास यांनी सांगितले की, वीज निर्मिती केंद्रांतून सोडले जाणारे पाणी धरणाखालील भागातील कोरडे तलाव भरण्यासाठी तसेच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरजही या पाण्यातून भागविली जात आहे.सूत्रांनी सांगितले की, अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे यंदा जूनमध्येच धोऽऽ धो पाऊस पडला आहे. सरदार सरोवराच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे सरोवरात चांगले पाणी आले आहे.वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरूव्यास यांनी सांगितले की, सध्या धरणात ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. नदीपात्रातील तसेच कालव्याच्या तोंडाशी अशा दोन्ही ठिकाणची वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू करण्यात आली आहेत. नदीपात्रातील वीज निर्मिती केंद्रात १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या दोन वीज निर्मिती केंद्रांत १०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. वीज निर्मिती केंद्रांद्वारे ७ हजार क्युसेक्स पाणी नर्मदा मुख्य कालव्यात सोडले जात आहे. तसेच ३३,००० क्युसेक्स पाणी नर्मदा नदीपात्रात सोडले जात आहे.व्यास यांनी सांगितले की, नदीपात्र आणि कालवा मुख या दोन्ही ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांतून सध्या दररोज १७ ते २० दशलक्ष युनिट वीज निर्माण होत आहे. या विजेची दररोजची किंमत ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये आहे.