शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:09 IST

जिवंत पाणीसाठा २,७०० द.ल.घ.मी. : मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर, इंदिरा सागर धरणातील विसर्गाचा लाभ

अहमदाबाद : गुजरातमध्ये मान्सूनचे आगमन नुकतेच झाले असले तरी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आता धरणात १२७.४६ मीटर पाणी असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११ मीटर बाकी आहे.सरदार सरोवराच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे. विशेषत: मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून खाली पाणी येत आहे. आता धरणातील जिवंत पाणीसाठा २,७०० दशलक्ष घनमीटर झाला आहे.सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे संचालक पी. सी. व्यास यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची पातळी १२७.४६ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११.२२ मीटरच बाकी आहे. धरणाची एकूण पाणीधारण उंची १३८.६८ मीटर आहे.गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित असलेल्या सरदार सरोवर धरणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण १३८.६८ मीटर क्षमतेने पाणी आले होते. २०१७ मध्ये उंची वाढविली गेल्यापासून पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.सोडलेले पाणी कोरड्या तलावातव्यास यांनी सांगितले की, वीज निर्मिती केंद्रांतून सोडले जाणारे पाणी धरणाखालील भागातील कोरडे तलाव भरण्यासाठी तसेच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरजही या पाण्यातून भागविली जात आहे.सूत्रांनी सांगितले की, अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे यंदा जूनमध्येच धोऽऽ धो पाऊस पडला आहे. सरदार सरोवराच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे सरोवरात चांगले पाणी आले आहे.वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरूव्यास यांनी सांगितले की, सध्या धरणात ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. नदीपात्रातील तसेच कालव्याच्या तोंडाशी अशा दोन्ही ठिकाणची वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू करण्यात आली आहेत. नदीपात्रातील वीज निर्मिती केंद्रात १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या दोन वीज निर्मिती केंद्रांत १०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. वीज निर्मिती केंद्रांद्वारे ७ हजार क्युसेक्स पाणी नर्मदा मुख्य कालव्यात सोडले जात आहे. तसेच ३३,००० क्युसेक्स पाणी नर्मदा नदीपात्रात सोडले जात आहे.व्यास यांनी सांगितले की, नदीपात्र आणि कालवा मुख या दोन्ही ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांतून सध्या दररोज १७ ते २० दशलक्ष युनिट वीज निर्माण होत आहे. या विजेची दररोजची किंमत ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये आहे.