शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

केंद्र सरकारच्या सहकार्याने संत रविदास मंदिर उभारण्यात राज्य सरकार आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:34 IST

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मदतीने संत रविदासांचे मंदिर नव्याने उभारण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. मंदिर उभारण्यात अडसर ठरणारी वन विभागाची ‘वादग्रस्त जमीन’ विमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यानिमित्ताने केली. वन परिक्षेत्रात असलेली ही जमीन दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (डीडीए) अखत्यारित आहे. केंद्र सरकारच त्यामुळे यासंबंधी निर्णय घेवू शकते. राज्य सरकारतर्फे दिल्ली विकास प्राधिकरणाला केंद्रीय वन मंत्रालयाकडे जमीन विमुक्त करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल, असे मत केजरीवालांनी व्यक्त केले.

केंद्राच्या मदतीने राज्य सरकार हे मंदिर उभारेल, अशी भूमिका घेत नुकतेच केजरीवालांनी केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पूरी यांना पत्र पाठवले. पत्रातून त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. १० आॅगस्ट ला डीडीए ने भाविकांच्या भावनांचा विचार न करता हे मंदिर पाडले होते.

संत रविदासांच्या अनुयायांनी त्यानंतर दिल्लीसह इतर राज्यात आंदोलन पुकारले. केवळ दलित समाजासाठी नाही, तर सर्व समाजासाठी संत रविदास श्रद्धेय आहेत. गेल्या पाच शतकांपासून रविदासांचे विचार अनेक पिढ्यांना सशक्त बनवत आहे, असे केजरीवाल म्हणाले.जमीन विमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. मंदिराच्या सोसायटीला केंद्र सरकाराकडून जमीन उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांच्या सहकार्याने मंदिर बांधण्यात आनंद होईल, अशी भावना के जरीवालांनी व्यक्त केले.दिल्ली विकास प्राधिकरणाची या जमिनीवर मालकी आहे. त्यामुळे जमीन मोकळी करण्याचा प्रस्ताव डीडीएला सादर करावा लागेल. राज्य सरकारच्या वन विभागाकडे हा प्रस्ताव येताच तो तत्काळ मंजुरीसाठी केंद्रीय वन मंत्रालयाकडे पाठवला जाईल. संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी जवळपास आठवडा लागेल. - राजेंद्र पाल गौतम, सामाजिक न्याय मंत्री, राज्य सरकार

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल