शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कडक सॅल्यूट! पत्नीच्या मृत्यूनंतर दान केले 50 लाख; ज्या गावात डॉक्टर नव्हता तिथे उभारणार रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 20:23 IST

Sant Gurusukh Das Saheb Donated Rs 50 Lakh : आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आहेत. इतरांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. अशीच एक व्यक्ती आता समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने तब्बल 50 लाख दान केले आहेत. ज्या गावात डॉक्टर मिळत नव्हता तिथे आता रुग्णालय साकारण्यात येणार आहे. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. 85 वर्षीय संत गुरुसुख दास साहेब (Sant Gurusukh Das Saheb) यांनी गावात रुग्णालय बांधण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयासाठी येणारा 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च ते स्वत: करणार आहेत. 

आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि उपचारासाठी वणवण भटकावे लागू नये, या उद्देशाने बालोद जिल्ह्यातील आपल्या गावात रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावात पूर्वी एक डॉक्टर मिळणं कठीण होतं, त्या गावात आज मोठं रुग्णालय बांधण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालोड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेल्या गावात 50 लाख रुपयांच्या देणगीतून हे रुग्णालय बांधले जात आहे. रक्कम दिल्यानंतर ग्रामविकास समिती व ग्रामपंचायतीच्या संमतीनंतर पंचायतीजवळील शासकीय जमिनीवर रुग्णालय उभारणीचे कामही सुरू झालं आहे. 

लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव केली दान

गावात रुग्णालय आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधेअभावी गावातील लोकांना होणारा त्रास पाहता गुरुसुख दास यांनी लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव दान केली आहे. गुरुसुख गावातील तलावाजवळ असलेल्या घरात एकटेच राहतात. 18 मे 2021 रोजी त्यांची पत्नी सोनाबाई यांचे निधन झालं. त्यांना मुले नाहीत. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आता आपली संपूर्ण मालमत्ता धर्मादाय कार्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गावात रुग्णालय बांधण्यासाठी देणगीदार गुरुसुख दास यांच्यासह गावचे प्रमुख, सरपंच आणि इतर वरिष्ठांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी त्याला संमती मिळवली. मुख्यमंत्री बघेल यांनीही या कामाचं कौतुक केलं.

सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार

गुरुसुख दास साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाची किंवा इतर प्राण्यांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व जीवांची सेवा केली पाहिजे. तब्येत बिघडल्याने अनेकवेळा ग्रामस्थांना उपचारासाठी खूप दूरवर फिरावं लागतं. रुग्णालयाच्या अंतरामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यात अडचण येते तसेच वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. मात्र आता रुग्णालय बांधल्यानंतर येथे लोकांना सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार आहे. त्यांची चांगली सोय होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडhospitalहॉस्पिटल