शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कडक सॅल्यूट! पत्नीच्या मृत्यूनंतर दान केले 50 लाख; ज्या गावात डॉक्टर नव्हता तिथे उभारणार रुग्णालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 20:23 IST

Sant Gurusukh Das Saheb Donated Rs 50 Lakh : आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आहेत. इतरांच्या मदतीसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. अशीच एक व्यक्ती आता समोर आली आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने तब्बल 50 लाख दान केले आहेत. ज्या गावात डॉक्टर मिळत नव्हता तिथे आता रुग्णालय साकारण्यात येणार आहे. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. 85 वर्षीय संत गुरुसुख दास साहेब (Sant Gurusukh Das Saheb) यांनी गावात रुग्णालय बांधण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयासाठी येणारा 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च ते स्वत: करणार आहेत. 

आपल्या पत्नीच्या निधनानंतर संत गुरुसुख दास साहेब यांनी स्वखर्चातून गावात रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि उपचारासाठी वणवण भटकावे लागू नये, या उद्देशाने बालोद जिल्ह्यातील आपल्या गावात रुग्णालय बांधण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावात पूर्वी एक डॉक्टर मिळणं कठीण होतं, त्या गावात आज मोठं रुग्णालय बांधण्याची तयारी सध्या सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बालोड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 28 किमी अंतरावर असलेल्या गावात 50 लाख रुपयांच्या देणगीतून हे रुग्णालय बांधले जात आहे. रक्कम दिल्यानंतर ग्रामविकास समिती व ग्रामपंचायतीच्या संमतीनंतर पंचायतीजवळील शासकीय जमिनीवर रुग्णालय उभारणीचे कामही सुरू झालं आहे. 

लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव केली दान

गावात रुग्णालय आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधेअभावी गावातील लोकांना होणारा त्रास पाहता गुरुसुख दास यांनी लाखो रुपयांची आयुष्यभराची ठेव दान केली आहे. गुरुसुख गावातील तलावाजवळ असलेल्या घरात एकटेच राहतात. 18 मे 2021 रोजी त्यांची पत्नी सोनाबाई यांचे निधन झालं. त्यांना मुले नाहीत. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी आता आपली संपूर्ण मालमत्ता धर्मादाय कार्यात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. गावात रुग्णालय बांधण्यासाठी देणगीदार गुरुसुख दास यांच्यासह गावचे प्रमुख, सरपंच आणि इतर वरिष्ठांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल, जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी त्याला संमती मिळवली. मुख्यमंत्री बघेल यांनीही या कामाचं कौतुक केलं.

सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार

गुरुसुख दास साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाची किंवा इतर प्राण्यांची सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व जीवांची सेवा केली पाहिजे. तब्येत बिघडल्याने अनेकवेळा ग्रामस्थांना उपचारासाठी खूप दूरवर फिरावं लागतं. रुग्णालयाच्या अंतरामुळे ग्रामस्थांना येण्या-जाण्यात अडचण येते तसेच वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. मात्र आता रुग्णालय बांधल्यानंतर येथे लोकांना सहज आणि पटकन उपचार घेणं शक्य होणार आहे. त्यांची चांगली सोय होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडhospitalहॉस्पिटल