शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

एकाच वेळी निवडणुकांसाठी मोदी आग्रही, सहमतीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:25 IST

देशभर लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात, याबाबत पंतप्रधान मोदी विशेष आग्रही आहेत.

सुरेश भटेवरानवी दिल्ली : देशभर लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात, याबाबत पंतप्रधान मोदी विशेष आग्रही आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात या महत्वाकांक्षी संकल्पनेबाबत सर्वपक्षीय सहमती तयार करण्यासाठी मोदी सरकार कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती हाती आली आहे.बिहारमधे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जद(यु) व तामिळनाडूत अद्रमुकचा या एकत्र निवडणुकांना पाठिंबा आहे. ओडिशात बीजू जनता दल, तेलंगणात टीआरएस व आंध्रप्रदेशात तेलुगु देशम देखील या प्रस्तावाला अनुकूल आहे. अन्य राज्यांनाही विश्वासात घेउन प्रत्यक्षात ही योजना राबवता येईल,असा अंदाज आल्याने पंतप्रधान मोदी याबाबत विशेष उत्साहात आहेत, असे माहितगारांना वाटते.नियोजित वेळापत्रकानुसार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आता साधारणत: १८ महिने शिल्लक आहेत. पाच वर्षांच्या कालखंडानंतर वेळेवर ही निवडणूक संपन्न झाली तर ती एप्रिल/मे २0१९ च्या सुमारास होईल. तथापि राजधानीत सत्तेच्या वर्तुळात सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ व त्रिपुरा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका २0१८ च्या अखेरीस आहेत. एकतर या चार राज्यांसोबत लोकसभेच्यामुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जावे अथवा महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांनाही सोबत घेण्यासाठी या चार राज्यांच्या निवडणुका ३ ते ४ महिने पुढे ढकलता येतील काय, याबाबत मोदी सरकारने विचारविनिमय सुरू केला आहे.प्रत्यक्षात असे घडले तर लोकसभा निवडणुकीबरोबर बिहार, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगड, त्रिपुरा, महाराष्ट्र व हरयाणा अशी ११ राज्ये लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुकीलाही तयार आहेत, असे चित्र देशात तयार होईल. पंतप्रधानांच्या आग्रही प्रस्तावाला देशातल्या बहुतांश राज्यांचा पाठिंबा असल्याने अन्य राज्यांवर मग साहजिकच त्याचा दबाव निर्माण करता येईल, अशी सत्ताधाºयांची अपेक्षा आहे. या विषयाचा बारकाईने विचार करण्यासाठी पंतप्रधानांचा एका खास मंत्रिसमुहाची नियुक्ती करण्याचा इरादा असल्याचे समजले आहे.देशात विविध क्षेत्रात अनेक कारणांनी मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी २0१८ हे वर्ष मोदी सरकारच्या दृष्टिने कसोटीचे व सत्वपरीक्षेचे वर्ष आहे. त्यामुळेच वातावरण अधिक खराब होण्याआधीच केंद्रासह जमेल तेवढ्या जास्तीत जास्त राज्यांच्या निवडणूकाही उरकणे इष्ट होईल, असा सत्ताधारी धुरिणांचा होरा आहे.व्हीव्हीपीएटी टाळण्यासाठी घाई?ईव्हीएम मशिनमधे छेडछाड करून देशात व विविध राज्यात निवडणुका जिंकल्याचा आरोप भाजप व मोदी सरकारवर यापूर्वी विरोधकांनी अनेक वेळा केला. सुप्रीम कोर्टाने ही शक्यता समूळ नष्ट करण्यासाठी मतदान यंत्रांमध्ये दिलेल्या मताची छापील पावती देण्याची सोय (पेपर आॅडिट ट्रेल ‘व्हीव्हीपॅट‘) करण्याचा आदेश दिला. या नेत्याच्या म्हणण्यानुसार न्यायालयीन आदेशाचे कसोशीने पालन झाले तर सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनसोबत ‘व्हीव्हीपॅट’ ची सोय निवडणूक आयोगाला करावीच लागेल.प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशिन्स लावण्याइतपत यंत्रे तोपर्यंत निवडणूक आयोगाला उपलब्ध होतील की नाही, याविषयी तूर्त साशंकतेचे वातावरण आहे. मतदानाच्या वेळी सत्ताधाºयांसाठी व्हीव्हीपॅट मशिन्स गैरसोयीची आहेत, मोदी सरकारलाती नकोच आहेत, निवडणूक आयोगालाही आगामी निवडणुकीत हा प्रयोग राबवता येऊनये, यासाठी केंद्र सरकारने आजवर बरीच चालढकल केली. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने (नाव जाहीर न करण्याच्या शर्तीवर) मतदान यंत्रांमधील ही ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणा गैरसोयीची ठरणार असल्याने मोदी सरकारने निवडणुकीच्या वेळापत्रकाबाबत अचानक भाजपला अनुकूल खेळ सुरु केला असल्याचा आरोप केला. तथापि लोकसभेची मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणूक अथवा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या तर एकाचवेळी इतकी मशिन्स उपलब्ध करणे आयोगाला शक्य होणार नाही, याचा अंदाज मोदी सरकारला असल्याने निवडणुकांच्या वेळापत्रक बदलण्याचा त्यांनी खेळ सुरू केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी