शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

प्रस्थापितांसमोर कधीही न झुकलेल्या व्रतस्थ पत्रकाराला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:11 IST

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या रूपाने कणखर टीकाकार आपल्यातून गेले.

आॅगस्टची सुरूवात राजकीय विश्वासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. करुणानिधी यांचे निधन, तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व सोमनाथ चटर्जी यांचे देहावसान, काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचे अकाली जाणे असे एकावर एक धक्के भारतीय राजकारणाला बसले. आता ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या रूपाने कणखर टीकाकार आपल्यातून गेले.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बसलेला हा मोठा धक्का आहे. त्यांनी धारदार लेखणीतून प्रस्थापित सरकारांच्या विरोधात कोरडे ओढले आहेत. त्यांचा शेवटचा लेख लोकमत टाइम्समध्ये गुरुवारीच प्रसिद्ध झाला. ते लोकमतचे नियमित लेखकच होते.मोदी सरकारने एनआरसीसंबंधातील धोरणांवर त्यांनी चांगलीच टीका ‘इमिग्रंट्स आॅर व्होट बँक’ या लेखातून केली आहे. त्यांनी कधीही कोणत्याही सरकारची बाजू घेतली नाही. नेहमीच आपल्या लेखणीतून चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले. ते १९७१च्या युद्धाचे, आणीबाणीचे साक्षीदार होते. आणीबाणीविरोधात त्यांनी दाखवलेले धैर्य पुढील अनेक पिढीसाठी प्रेरणादायी ठरत गेले. आणीबाणीनंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून आपली लेखणी चालवली. त्यांनी आणीबाणीविषयी लिहिलेल्या ‘द जजमेंट’ या पुस्तकाने त्या काळात देशामध्ये खूपच खळबळ माजली होती.कुलदीप नायर यांचे लेख वाचतच आम्ही पत्रकारितेचा प्रवास करत आलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळावे असे स्वप्न होते. खरे तर सत्तरच्या दशकातील प्रत्येक पत्रकाराचे हेच स्वप्न होते. एकीकडे दिल्लीत पत्रकारांची मोठी फळी सरकारांचे तळवे चाटण्यात धन्यता मानत होती तर दुसरीकडे अशा कुलदीप नायर यांच्यासारख्याव्रतस्थ पत्रकाराचा आदर्श अनेकांसमोर होता.एका नव्या उंचीवर असतानाही त्यांनी आपल्यातला साधेपणा कधीही हरवू दिला नाही. ते पत्रकारांसाठी आदर्श होते. त्यांना भेटण्याची संधी पाच वर्षांपूर्वी मिळाली तेव्हा अनेक वर्षांपासून मनात असलेला प्रश्न विचारला. एक स्वतंत्र विचारांचा पत्रकार सरकारचे पद कसे स्वीकारू शकतो आणि त्यानंतरही स्वत:ला स्वतंत्र कसा म्हणवून घेऊ शकतो?, असा होता तो प्रश्न.ते स्व. लालबहाद्दुर शास्त्री यांचे माध्यम सल्लागार होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वतंत्ररित्या पत्रकारिता सुरू केली होती. त्यानंतर १९९० मध्ये व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरील प्रश्नावर ते उत्तरले : अहो, कोणतीही गोष्ट करताना आपली तत्वनिष्ठा सोडायची नाही. कधीही नोकरी मागायची नाही आणि कधीच झुकायचे नाही.हा एक मोठा धडा आहे.ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटलेय की, ते असे पत्रकार होते, जे कधीही प्रसिद्धी आणि पैशांच्या मागे धावले नाहीत. आपल्या सद्सदविवेक बुद्धीला जे पटले तेच त्यांनी नेहमी केले. सर्वधर्मसमभावासाठी आणि पत्रकारितेच्या निष्ठेबद्दल ते कायम स्वत:ला कटिबद्ध समजत आणि त्यांनी आणीबाणीच्या काळात दाखवलेल्या धैर्याची उदाहरणे आजही दिली जातील.या व्रतस्थ पत्रकाराला सलाम.-हरिश गुप्तासरकारमध्ये नेमके काय चाललेय याचा असायचा कायम शोधकुलदीप नायर यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्यसभेचा सदस्यत्व देऊन सन्मानित करण्यात आले होते. पण त्यांचा पिंड पत्रकारितेचाच होता आणि सरकारमध्ये नेमके काय चाललेय हे त्यांची नजर कायम शोधत असायची.‘बिटविन द लाइन्स’अंजाम नावाच्या एका उर्दू वृत्तपत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी इंग्रजी पत्रकारितेकडे आपली वाटचाल केली. त्यांनी यूएनआय या वृत्तसंस्थेत काम केले. त्यानंतर द स्टेट्समन आणि नंतर इंडियन एक्स्प्रेसच्या माध्यमातून आपल्या शब्दांची धार अनेक सरकारांना दाखवून दिली. ‘बिटविन द लाइन्स’ हा त्यांचा सर्वांधिक वाचला जाणारा कॉलमही त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुरू होता.

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरJournalistपत्रकार