शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

By admin | Updated: September 30, 2016 02:35 IST

नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.

नवी दिल्ली : नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले. पाकिस्तानकडून सीमेवर सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तेथील दहशतवाद्यांनी काश्मिरात घातलेला गोंधळ याच्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण होतेच. उरी हल्ल्यानंतर तर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, अशी इच्छा भारतीयांमध्ये दिसत होती. त्यामुळेच लष्करी कारवाईची बातमी कळताच, साऱ्या भारतीयांनी तिचे स्वागत केले. आमच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी देश संकटात असताना सारे भारतीय कसे एकत्र येतात, याचेच दर्शन घडले. लष्करी कारवाईचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही स्वागत केले. आम्ही पूर्णपणे लष्कराच्या बाजुने उभे आहोत, असे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केल्याबद्दल आम्ही लष्कराचे अभिनंदन करतो. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लष्करी कारवाईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लष्करी कारवाईचे भाजपने स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. मोदी यांचे सरकार हे कृतीवर भर देते, शब्दांवर नाही. आम्ही सशस्त्र दलांना प्रणाम करतो। पाकपुरस्कृत दहशतवादापासून आमच्या सीमांचे रक्षण केल्याबद्दल मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतो. जबाबदार सरकार बोलते कमी व कृती जास्त करते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचे हे धोरण आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले.दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण ठिकाणांवर जी धाडसी कारवाई केली त्याबद्दल आम्हाला या दलांचा अभिमान वाटतो, असे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले. पाकिस्तानातूनच जन्माला येणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी राजनैतिक पातळीवर वारंवार प्रयत्न करण्यात आले परंतु पाकने वर्तन सुधारून घेतले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मेहबुबा मुफ्ती यांची चिंताश्रीनगर : केंद्रीय गृाहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कारवाईची माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली होती. त्यानंतर या कारवाईचे परिणाम भारतीय सीमेवर असलेल्या गावांवर होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकारांमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागेल, असे सांगून, त्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली.