शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रत्येक भारतीयाचा लष्कराला सलाम

By admin | Updated: September 30, 2016 02:35 IST

नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले.

नवी दिल्ली : नियंत्रण रेषे पलीकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर गुरुवारी पहाटे करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे वृत्त येताच देशात आनंद आणि समाधानाचे वातावरण पसरले. पाकिस्तानकडून सीमेवर सतत होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तेथील दहशतवाद्यांनी काश्मिरात घातलेला गोंधळ याच्यामुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण होतेच. उरी हल्ल्यानंतर तर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, अशी इच्छा भारतीयांमध्ये दिसत होती. त्यामुळेच लष्करी कारवाईची बातमी कळताच, साऱ्या भारतीयांनी तिचे स्वागत केले. आमच्यात एरवी कितीही मतभेद असले तरी देश संकटात असताना सारे भारतीय कसे एकत्र येतात, याचेच दर्शन घडले. लष्करी कारवाईचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही स्वागत केले. आम्ही पूर्णपणे लष्कराच्या बाजुने उभे आहोत, असे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे त्यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची सविस्तर माहिती दिली. काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केल्याबद्दल आम्ही लष्कराचे अभिनंदन करतो. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, लष्करी कारवाईला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लष्करी कारवाईचे भाजपने स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. मोदी यांचे सरकार हे कृतीवर भर देते, शब्दांवर नाही. आम्ही सशस्त्र दलांना प्रणाम करतो। पाकपुरस्कृत दहशतवादापासून आमच्या सीमांचे रक्षण केल्याबद्दल मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतो. जबाबदार सरकार बोलते कमी व कृती जास्त करते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील या सरकारचे हे धोरण आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले.दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण ठिकाणांवर जी धाडसी कारवाई केली त्याबद्दल आम्हाला या दलांचा अभिमान वाटतो, असे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले. पाकिस्तानातूनच जन्माला येणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी राजनैतिक पातळीवर वारंवार प्रयत्न करण्यात आले परंतु पाकने वर्तन सुधारून घेतले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मेहबुबा मुफ्ती यांची चिंताश्रीनगर : केंद्रीय गृाहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कारवाईची माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना दिली होती. त्यानंतर या कारवाईचे परिणाम भारतीय सीमेवर असलेल्या गावांवर होणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकारांमुळे निष्पाप लोकांना त्रास सहन करावा लागेल, असे सांगून, त्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली.