शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

सलमान सुटला !

By admin | Updated: July 26, 2016 05:39 IST

१८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून

जोधपूर : १८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची सोमवारी निर्दोष मुक्तता केली. चिंकारा हा राजस्थानचा राज्यप्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार तो संरक्षित वन्यजीव आहे. जोधपूरजवळील भावाड येथे व त्यानंतरच्या रात्री मथानिया येथील घोदा फार्म येथे मिळून २६ व २७ सप्टेंबर १९९८ दरम्यानच्या रात्री चिंकारा जातीच्या दोन हरणांची अवैध शिकार केल्याचे खटले राजस्थान सरकारच्या वन विभागाने सलमान खानवर दाखल केले होते. सन २००६ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने या दोन खटल्यांमध्ये सलमान खानला अनुक्रमे एक वर्ष व पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या.सत्र न्यायालयानेही हानिकाल कायम ठेवल्यानंतर सलमान खानने याविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाकडे दोन अपिले केली होती. न्या. निर्मलजीत कौर यांनी अपुऱ्या पुराव्यामुळे संशयाचा फायदा देत दोन्ही अपिले मंजूर करून सलमान खानची दोन्ही खटल्यांत निर्दोष मुक्तता केली.आजच्या या निकालाच्या वेळी स्वत: सलमान खान न्यायालयात हजर नव्हता. मात्र त्याची बहीण अलविरा उपस्थित होती.

शुक्लकाष्ट कायम...- या निकालामुळे सलमान खानला दिलासा मिळाला असला तरी त्या चित्रिकरणाच्या वेळी केलेल्या कथित अवैध शिकारींच्या आरोपांवरून त्याच्यामागे लागलेले खटल्यांचे शुल्ककाष्ठ पूर्णपणे सुटलेले नाही. आणखी दोन खटल्यांचे निकाल व्हायचे आहेत. त्यापैकी एक खटला ज्याच्या परावान्याची मुदत संपून गेली आहे अशा शस्त्राचा अवैध वापर केल्याबद्दल आर्म्स अ‍ॅक्टखालचा आहे. तर, दुसरा १ व २ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कांकणी येथे दोन काळविटांची अवैध शिकार केल्यासंबंधीचा आहे.सलमानविरुद्धच्या मुंबईतील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यातील राज्य सरकारने केलेले अपिलही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यात सत्र न्यायालयाने ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली होती.आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे. या निकालाने सलमानसह आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे.- अर्पिता, सलमान खानची बहीणत्या दिवशी वाहन चालविणाऱ्या हरीष दुलानीच्या जबानीवरून सलमानला या खटल्यांत निष्कारण गोवले गेल्याचे आमचे सुरुवातीपासून म्हणणे होते. उच्च न्यायालयाच्या निकालाने तेच सिद्ध झाले. -अ‍ॅड. महेश बोरा, सलमानचे वकीलनिकालपत्राचा सविस्तर अभ्यास केल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे की नाही याचा राज्य सरकार निर्णय घेईल.-के.एल. ठाकूर, अतिरिक्त महाधिवक्ता, राजस्थान