शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

सलमान सुटला !

By admin | Updated: July 26, 2016 05:39 IST

१८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून

जोधपूर : १८ वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला असताना चिंकारा जातीच्या दोन हरिणांची अवैध शिकार केल्याबद्दल दाखल झालेल्या दोन खटल्यांतून राजस्थान उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची सोमवारी निर्दोष मुक्तता केली. चिंकारा हा राजस्थानचा राज्यप्राणी असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार तो संरक्षित वन्यजीव आहे. जोधपूरजवळील भावाड येथे व त्यानंतरच्या रात्री मथानिया येथील घोदा फार्म येथे मिळून २६ व २७ सप्टेंबर १९९८ दरम्यानच्या रात्री चिंकारा जातीच्या दोन हरणांची अवैध शिकार केल्याचे खटले राजस्थान सरकारच्या वन विभागाने सलमान खानवर दाखल केले होते. सन २००६ मध्ये दंडाधिकारी न्यायालयाने या दोन खटल्यांमध्ये सलमान खानला अनुक्रमे एक वर्ष व पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या होत्या.सत्र न्यायालयानेही हानिकाल कायम ठेवल्यानंतर सलमान खानने याविरुद्ध राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाकडे दोन अपिले केली होती. न्या. निर्मलजीत कौर यांनी अपुऱ्या पुराव्यामुळे संशयाचा फायदा देत दोन्ही अपिले मंजूर करून सलमान खानची दोन्ही खटल्यांत निर्दोष मुक्तता केली.आजच्या या निकालाच्या वेळी स्वत: सलमान खान न्यायालयात हजर नव्हता. मात्र त्याची बहीण अलविरा उपस्थित होती.

शुक्लकाष्ट कायम...- या निकालामुळे सलमान खानला दिलासा मिळाला असला तरी त्या चित्रिकरणाच्या वेळी केलेल्या कथित अवैध शिकारींच्या आरोपांवरून त्याच्यामागे लागलेले खटल्यांचे शुल्ककाष्ठ पूर्णपणे सुटलेले नाही. आणखी दोन खटल्यांचे निकाल व्हायचे आहेत. त्यापैकी एक खटला ज्याच्या परावान्याची मुदत संपून गेली आहे अशा शस्त्राचा अवैध वापर केल्याबद्दल आर्म्स अ‍ॅक्टखालचा आहे. तर, दुसरा १ व २ आॅक्टोबर दरम्यानच्या रात्री कांकणी येथे दोन काळविटांची अवैध शिकार केल्यासंबंधीचा आहे.सलमानविरुद्धच्या मुंबईतील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ खटल्यातील राज्य सरकारने केलेले अपिलही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यात सत्र न्यायालयाने ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षा हायकोर्टाने रद्द केली होती.आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा आहे. या निकालाने सलमानसह आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे.- अर्पिता, सलमान खानची बहीणत्या दिवशी वाहन चालविणाऱ्या हरीष दुलानीच्या जबानीवरून सलमानला या खटल्यांत निष्कारण गोवले गेल्याचे आमचे सुरुवातीपासून म्हणणे होते. उच्च न्यायालयाच्या निकालाने तेच सिद्ध झाले. -अ‍ॅड. महेश बोरा, सलमानचे वकीलनिकालपत्राचा सविस्तर अभ्यास केल्यावर सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे की नाही याचा राज्य सरकार निर्णय घेईल.-के.एल. ठाकूर, अतिरिक्त महाधिवक्ता, राजस्थान