शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

मरकजमध्ये कार्यक्रम न घेण्याचा साद यांनी सल्ला धुडकावला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 05:05 IST

बुद्धिवंतांनी केली होती विनंती : अनुयायांना संकटात लोटल्याचे मत

नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मुहम्मद साद कंधलावी यांना त्यांचे स्वत:चे सहकारी, अनेक ज्येष्ठ मुस्लिम धर्मगुरू व बुद्धिवंतांनी कोविड-१९चा उद्रेक झाल्यानंतर लगेच गेल्या मार्च महिन्यातील निजामुद्दीन कार्यक्रम रद्द करा असा सल्ला देऊन विनंती केली होती; परंतु साद यांनी ती ऐकली नाही, असे समजते.माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा, असे आपल्या अनुयायांना शिकवण दिलेल्या साद कंधलावी यांच्या दुराग्रहामुळे त्यांच्या शेकडो अनुयायांचे जीवित संकटात लोटले गेले आहे. एवढेच नाही तर मुस्लिमांची प्रतिमाही कलंकित झाली आहे, असे मुस्लिमांतील अनेकांचे म्हणणे आहे. निजामुद्दीनमधील कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेक जणांची कोविड-१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे व त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्याचवेळी साद कंधलावी हे आपल्या मूठभर सल्लागारांना घेऊन लपून बसले आहेत. देशात कोरोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यातील ३० टक्के हे जमातशी संबंधित आहेत. हीच टक्केवारी उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ५० टक्क्यांपर्यंत जाते. तबलिगी जमातचा दुसरा गट ‘शुरा-ए- जमात’ने कोरोना विषाणूचा उद्रेक होताच आपले सगळे कार्यक्रम रद्द केले. अविचल राहिलेले मौलाना साद यांनी पूर्वीच ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम घेण्याचा आग्रह केला ‘मशिदीतील मृत्यू उत्तम’ याबाबत प्रवचनही दिले.नाव न सांगण्याच्या अटीवर मौलाना सादचे एक निकटस्थ म्हणाले की, त्यांना अनेकदा कार्यक्रम रद्द करण्याबाबत सांगण्यात आले होते, मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी स्वत:च्याच अनुयायांना मृत्यूच्या खाईत ढकलले. काँग्रेसचे नेते मीम अफजल आणि मुस्लिम नेते जफर सरेशवाला यांनीही मौलाना साद यांना कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला, मात्र, ते जुमानले नाहीत, असा खुलासा केला आहे. दुसरीकडे मौलाना साद यांचे सहकारी मौलाना हयारिस यांनी त्यांची बाजू घेतली. ते म्हणाले,जेव्हा जमातचे सदस्य विदेशातून येत होते, तेव्हा सरकारने त्यांना परवानगी दिली, त्यात आमची काय चूक आहे?कोरोनाच्या महामारीबद्दल ते अज्ञानी कसेतबलिगी जमातचे ज्येष्ठ मोहम्मद आलम म्हणाले की, ‘‘साद यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव होती. परंतु, त्यांच्या दुराग्रही वृत्तीमुळे निष्पाप तबलिगी महामारीच्या जबड्यात लोटले गेले’’.च्जी व्यक्ती जगातील मुस्लिमांचे आपण आमीर असल्याचा दावा करते आणि मक्का आणि मदिनानंतर तबलिगी मरकज हे सर्वात पवित्र स्थळ असल्याचे सांगते ती कोरोना विषाणूच्या महामारीबद्दल एवढी कशी अज्ञानी राहू शकते, असा प्रश्न त्यांनी विचारला.च्आणखी एक वृद्ध तबलिगी सदस्य लियाकतअलीखान म्हणाले की, ‘‘जबाबदार मुस्लिम बुद्धीवंतांनी दिलेला सल्ला मौलाना साद यांनी का निरुपयोगी ठरवला? आणि आता ते का लपून बसले आहेत व विषाणूची बाधा झाली की नाही याची तपासणी का करून घेत नाहीत?’’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या