शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

७ महिन्यांत ८७ हजार जणांनी सोडले भारताचे नागरिकत्व; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 20:57 IST

S Jayshankar Lok Sabha: भारतीयांनी नागरिकत्व सोडण्याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली.

S Jayshankar Lok Sabha: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूर हिंसाचाराबाबत विरोधक आक्रमक झाले असून, हा मुद्दा लावून धरला आहे. देशभरातून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. यातच आता गेल्या अवघ्या ७ महिन्यात तब्बल ८७,०२६ भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली. 

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, सन २०२२ मध्ये २,२५,६२० भारतीयांनी नागरिकत्व सोडले. त्यापूर्वी २०२१ मध्ये १,६३,३७० जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले. याशिवाय सन २०२० मध्ये ८५,२५६ जणांनी, २०१९ मध्ये १,४४,०१७ जणांनी, २०१८ मध्ये १,३४,५६१ जणांनी, सन २०१५ मध्ये ३१,४८९ जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले, अशी सविस्तर माहिती जयशंकर यांनी दिली.

मोठ्या संख्येने नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत

सन २०१४ मध्ये १,२९,३२८ जणांनी, २०१३ मध्ये १,३१,४०५ जणांनी, २०१२ मध्ये १,२०,९२३ जणांनी आणि २०११ मध्ये १,२२,८१९ जणांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत. शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या अनेक भारतीयांनी वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारले असून त्यांनी यासाठी पसंती दिली आहे. परदेशातील भारतीय समुदाय ही देशाची संपत्ती आहे. सरकारने परिवर्तनात्मक बदल घडवून आणला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या दोन आर्थिक वर्षात खटल्यांवर १०२ कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्रीय विधि मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये नोंदवलेल्या ६.३६ लाख प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार आहेत.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनS. Jaishankarएस. जयशंकरlok sabhaलोकसभा