शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७ महिन्यांत ८७ हजार जणांनी सोडले भारताचे नागरिकत्व; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 20:57 IST

S Jayshankar Lok Sabha: भारतीयांनी नागरिकत्व सोडण्याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली.

S Jayshankar Lok Sabha: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूर हिंसाचाराबाबत विरोधक आक्रमक झाले असून, हा मुद्दा लावून धरला आहे. देशभरातून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. यातच आता गेल्या अवघ्या ७ महिन्यात तब्बल ८७,०२६ भारतीयांनी त्यांचे नागरिकत्व सोडले आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली. 

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, सन २०२२ मध्ये २,२५,६२० भारतीयांनी नागरिकत्व सोडले. त्यापूर्वी २०२१ मध्ये १,६३,३७० जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले. याशिवाय सन २०२० मध्ये ८५,२५६ जणांनी, २०१९ मध्ये १,४४,०१७ जणांनी, २०१८ मध्ये १,३४,५६१ जणांनी, सन २०१५ मध्ये ३१,४८९ जणांनी भारताचे नागरिकत्व सोडले, अशी सविस्तर माहिती जयशंकर यांनी दिली.

मोठ्या संख्येने नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत

सन २०१४ मध्ये १,२९,३२८ जणांनी, २०१३ मध्ये १,३१,४०५ जणांनी, २०१२ मध्ये १,२०,९२३ जणांनी आणि २०११ मध्ये १,२२,८१९ जणांनी त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडले, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने भारतीय नागरिक भारत सोडून इतर देशात जात आहेत. शिक्षणासाठी परदेशात जाणार्‍या अनेक भारतीयांनी वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारले असून त्यांनी यासाठी पसंती दिली आहे. परदेशातील भारतीय समुदाय ही देशाची संपत्ती आहे. सरकारने परिवर्तनात्मक बदल घडवून आणला आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या दोन आर्थिक वर्षात खटल्यांवर १०२ कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्रीय विधि मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि विभाग देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये नोंदवलेल्या ६.३६ लाख प्रलंबित प्रकरणांमध्ये पक्षकार आहेत.

 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनS. Jaishankarएस. जयशंकरlok sabhaलोकसभा