शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

“कोणत्याही अटीवर पाकिस्तानशी चर्चा नाही, चीनबाबत पटेलांचे धोरण राबवणार”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:11 IST

S Jaishankar News: भारत आणि कॅनडातील संघर्षाबाबत बोलताना जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली

S Jaishankar News: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत भारताचे धोरण स्पष्ट केले असून, यातून दोन्ही देशांना एक थेट संदेश दिला आहे. भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानचा हात आहे. सीमेपलीकडील दहशतवादाच्या माध्यमातून भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू पण त्याच्या अटींवर नाही. तसेच कॅनडात खलिस्तानी ताकद मजबूत होत आहेत, हे भारताच्या किंवा कॅनडाच्या हिताचे नाही, असे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

एका मुलाखतीत बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारतासोबत चर्चा व्हावी, यावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सीमापार दहशतवादाचा वापर करत आहे. आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी वाटाघाटी करणार नाही, असे नाही. मात्र, पाकिस्तानने ज्या अटी घातल्या आहेत त्याआधारे आम्ही वाटाघाटी करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

चीनला प्रत्युत्तर देण्यावरून नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद होते

भारत आणि चीनसोबतच्या संबंधांवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, नेहरूंनी चीन फर्स्ट या धोरणावर काम केले. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात सुरुवातीपासूनच चीनला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर मतभेद होते. सरदार पटेल यांनी चीनशी व्यवहार करताना सुरू केलेल्या वास्तववादाच्या प्रवाहानुसार मोदी सरकार काम करत आहे. परस्पर संबंधांवर आधारित असे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी या गोष्टींवर मान्यता असल्याशिवाय संबंध पुढे जाऊ शकत नाहीत, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भारत-कॅनडा संबंध आणि खलिस्तानी मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, मुख्य मुद्दा हा आहे की, कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानी शक्तींना भरपूर स्थान देण्यात आले आहे. संबंधांना हानी पोहोचवणाऱ्या कामांमध्ये गुंतण्यासाठी त्यांना मोकळीक दिली आहे. मला वाटते हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर