शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

“कोणत्याही अटीवर पाकिस्तानशी चर्चा नाही, चीनबाबत पटेलांचे धोरण राबवणार”: एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 14:11 IST

S Jaishankar News: भारत आणि कॅनडातील संघर्षाबाबत बोलताना जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली

S Jaishankar News: देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनबाबत भारताचे धोरण स्पष्ट केले असून, यातून दोन्ही देशांना एक थेट संदेश दिला आहे. भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानचा हात आहे. सीमेपलीकडील दहशतवादाच्या माध्यमातून भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आम्ही पाकिस्तानशी चर्चा करू पण त्याच्या अटींवर नाही. तसेच कॅनडात खलिस्तानी ताकद मजबूत होत आहेत, हे भारताच्या किंवा कॅनडाच्या हिताचे नाही, असे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

एका मुलाखतीत बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, भारतासोबत चर्चा व्हावी, यावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सीमापार दहशतवादाचा वापर करत आहे. आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी वाटाघाटी करणार नाही, असे नाही. मात्र, पाकिस्तानने ज्या अटी घातल्या आहेत त्याआधारे आम्ही वाटाघाटी करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले. 

चीनला प्रत्युत्तर देण्यावरून नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात मतभेद होते

भारत आणि चीनसोबतच्या संबंधांवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, नेहरूंनी चीन फर्स्ट या धोरणावर काम केले. नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात सुरुवातीपासूनच चीनला प्रत्युत्तर कसे द्यायचे यावर मतभेद होते. सरदार पटेल यांनी चीनशी व्यवहार करताना सुरू केलेल्या वास्तववादाच्या प्रवाहानुसार मोदी सरकार काम करत आहे. परस्पर संबंधांवर आधारित असे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी या गोष्टींवर मान्यता असल्याशिवाय संबंध पुढे जाऊ शकत नाहीत, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भारत-कॅनडा संबंध आणि खलिस्तानी मुद्द्यावर परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, मुख्य मुद्दा हा आहे की, कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानी शक्तींना भरपूर स्थान देण्यात आले आहे. संबंधांना हानी पोहोचवणाऱ्या कामांमध्ये गुंतण्यासाठी त्यांना मोकळीक दिली आहे. मला वाटते हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकर