शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Russia vs Ukraine War: भारत सरकार काहीच करत नाही; राहुल गांधींनी मांडली युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलीची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 21:26 IST

Russia vs Ukraine War: राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीचा व्हिडीओ ट्विट

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेन युद्धाचा पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. रविवारी यासंदर्भात मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बंकरमध्ये दिवस काढावे लागले आहेत. युक्रेन सोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. याकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लक्ष वेधलं आहे.

राहुल गांधींनी युक्रेनमधील अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची अवस्था बिकट होत चालली आहे. भारत सरकार त्यांच्या घरवापसीसाठी प्रभावी पावलं उचलत नाहीए,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमधील तरुणी युक्रेनमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहे.

दुतावासातील अधिकारी फोन उचलत नाहीत. अनेकदा कॉल करूनही त्यांच्याकडून उत्तर मिळत नाही, अशी व्यथा व्हिडीओमधील विद्यार्थिनी मांडत आहे. 'इतर देशांनी त्यांच्या नागरिकांची युक्रेनमधून सुटका केली. पण भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. रोमानियाची सीमा इथून ८०० किलोमीटरवर आहे. आम्ही तिथपर्यंत कसं जायचं?,' असा सवाल विद्यार्थिनीनं उपस्थित केला आहे. याआधी राहुल गांधींनी भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली होती. राहुल गांधींनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलंय की, ज्यारितीने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडीओ,फोटो येत आहेत ते पाहून मला त्यांच्या पालकांची चिंता समजू शकते. असे व्हिडीओ पाहून हिंसा सहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वेदना होत असतील. कुठल्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. भारत सरकारने यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी तात्काळ मिशन हाती घेतले पाहिजे. आपल्या मुलांना अशारितीने सोडू शकत नाही

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाRahul Gandhiराहुल गांधी