शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:26 IST

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी ऑपरेशन गंगाही राबविले जात आहे. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

वाराणसी येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी येथे सभा घेत आहेत. काय गरज आहे? जर आपले रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध होणार, हे आपल्याला आधीपासूनच माहीत होते. तेव्हाच आपण भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही."

ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना त्यांच्याच भरवशावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही, तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान निवडणूक सभा घेत आहेत. कशाची आवश्यकता आहे. भारतीयांना परत आणणे आवश्यक नाही का? असा सवालही ममता यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया