शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:26 IST

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी ऑपरेशन गंगाही राबविले जात आहे. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

वाराणसी येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी येथे सभा घेत आहेत. काय गरज आहे? जर आपले रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध होणार, हे आपल्याला आधीपासूनच माहीत होते. तेव्हाच आपण भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही."

ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना त्यांच्याच भरवशावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही, तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान निवडणूक सभा घेत आहेत. कशाची आवश्यकता आहे. भारतीयांना परत आणणे आवश्यक नाही का? असा सवालही ममता यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया