शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 18:26 IST

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी ऑपरेशन गंगाही राबविले जात आहे. यातच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे.

वाराणसी येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान मोदी येथे सभा घेत आहेत. काय गरज आहे? जर आपले रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध होणार, हे आपल्याला आधीपासूनच माहीत होते. तेव्हाच आपण भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही."

ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना त्यांच्याच भरवशावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही, तर युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि पंतप्रधान निवडणूक सभा घेत आहेत. कशाची आवश्यकता आहे. भारतीयांना परत आणणे आवश्यक नाही का? असा सवालही ममता यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया