शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War: रशियन रणगाडे असे कसे उद्ध्वस्त झाले? युक्रेन युद्धावरून भारतीय सैन्य चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:07 IST

युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. हे रणगाडे भारतीय सैन्य देखील वापरते.

युक्रेनच्या सैन्याने रशियन रणगाड्यांना अशाप्रकारे उध्वस्त केलेय की रशियन फौजांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. युक्रेन आज ताब्यात घेऊ, उद्या ताब्यात घेऊ म्हणणाऱ्या रशियाला आज ४६ दिवस झाले तरी विजय घोषित करता आलेला नाही. उलट ताब्यात आलेले प्रदेश सोडावे लागत आहेत. या साऱ्या घडामोडींमुळे भारतीय सैन्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

या युद्धावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे. या युद्धातून शहाणे होत भारतीय सैन्य आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे. भारताकडे रशियासारखेच रणगाडे आहेत. यामुळे जमिनीवरील युद्धाचा धोका असलेल्या भारताला पाकिस्तान, चीनकडून मोठा धोका आहे. यामुळे रशियाच्या अवस्थेचा अभ्यास करून भारतीय सैन्य पुढील काळात आपल्या रणगाड्यांमध्ये बदल करणार आहे. 

युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. युक्रेनने याचाच फायदा उठवत अँटी टँक गायडेड मिसाईचा तुफान वापर केला आहे. ही क्षेपणास्त्रे अमेरिकेची आणि युरोपीय देशांची जरी असली तरी आपण तयार राहिलेले चांगले असा विचार भारताने केला आहे. 

युद्धभूमी बनलेल्या युक्रेनमधील प्रत्येक घडामोडींवर भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर आणि अधिकारी लक्ष ठेवून आहेत, कारण तेथील लढाईत वापरल्या जाणार्‍या रणगाड्यांसह अनेक युद्धसामुग्री भारताशी साधर्म्य साधणारी आहे. तेथून मिळणाऱ्या माहितीचे गांभीर्याने विश्लेषण केले जात आहे. सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, येत्या काही वर्षांत भारतीय सैन्याला मिळणाऱ्या रणगाड्यांमध्ये युक्रेन-रशिया युद्धातील इनपुट्स वापरून बदल केले जातील. 

भारत का चिंतेत...T-90, T-72 आणि BMP मालिकेतील रणगाड्यांसह रशियन आर्मर्ड वाहने भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. भारतीय लष्कराने यापूर्वी हे रणगाडे वाळवंट आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले होते, परंतु आता ते चीनच्या सीमेवरही तैनात आहेत. लडाखपासून सिक्कीमपर्यंत हे रणगाडे मोठ्या संख्येने भारताच्या सीमांचे रक्षण करत आहेत. असे असताना भारतीय सैन्याला रशियाची हे रणगाडे अपयशी ठरले तर आपल्याला त्याचा फटका बसेल असे वाटत आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndian Armyभारतीय जवान