शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नुकसान रशियाचं, पण धक्का भारताला; T-90M च्या थेट शिकारीनं वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 20:24 IST

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मोठा दणका; भारताचीही वाढली चिंता

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही युद्ध थांबण्याचे संकेत मिळत नाहीत. गेल्या दोन महिन्यात युक्रेनचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनसोबतच रशियालादेखील युद्धाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. रशियाची अनेक विमानं आणि रणगाडे युक्रेनच्या लष्करानं जमीनदोस्त केली आहेत. 

दोन महिन्यांच्या युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का आज बसला. रशियन लष्कराच्या ताफ्यातील टी-९० एम रणगाडा युक्रेनच्या सैन्यानं उद्ध्वस्त केला. टी-९० एम रणगाडा अत्याधुनिक मानला जातो. युक्रेननं रशियाचा रणगाडा उद्ध्वस्त केला असला तरी त्याचा धक्का भारतालादेखील बसला आहे. कारण भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात या रणगाड्याचा वापर करतं. 

रशियाची निर्मिती असलेल्या टी-९० एम रणगाड्यामध्ये स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा आहे. शत्रू सैन्याच्या रणगाड्यानं हल्ला केल्यास ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि रणगाड्याचा बचाव करते. युक्रेनच्या सैन्यानं एक ड्रोन फुटेज जारी केलं आहे. त्यात टी-९० एम रणगाडा उद्ध्वस्त होताना दिसत आहे. या रणगाड्याची किंमत ३९ कोटी रुपये आहे. युक्रेनी सैन्यानं रशियाची थर्मोबेरिक रॉकेट यंत्रणादेखील उद्ध्वस्त केली आहे.

युक्रेनी वर्तमान कीव्ह इंडिपेंडंटच्या पत्रकार इलिया यांनी ४ मे रोजी एक फोटो शेअर केला. त्यात रशियाच्या टी-९० एम रणगाड्याचे अवशेष दिसत आहेत. युक्रेनच्या ईशान्य खारकीव्ह ओब्लास्ट परिसरात टी-९० एम रणगाड्यावर थेट हल्ला झाला. रशियन लष्करातील अत्याधुनिक रणगाड्याला लक्ष्य केल्यानं युक्रेनी फौजेचं मनोबल उंचावलं आहे. रशियन लष्कराकडे १०० टी-९० एम रणगाडे आहेत. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndian Armyभारतीय जवान