शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत रूपानींचे सरकार सत्तारूढ

By admin | Updated: August 8, 2016 04:40 IST

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल

अहमदाबाद : मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसोबत गुजरातेत विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नवीन सरकार सत्तारूढ झाले असून, मावळत्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना वगळत गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुका ध्यानात घेऊन नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या नेतृत्वाखालील २५ जणांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुजरातेत पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपद निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरवरून मुख्यमंत्री विजय रूपानी आणि नितीन पटेल यांचे अभिनंदन केले आहे.गुजरातेत २०१७ अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रूपानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते. पटेल समुदायाच्या ८ नेत्यांचा, ओबीसीच्या ८, क्षत्रिय समुदाच्या तीन, आदिवासी समुदायाच्या दोन, तर ब्राह्मण, जैन, सिंधी आणि दलित समुदायाच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विजय रूपानी हे गुजरातचे नववे मुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे सौराष्ट्र, उत्तर, दक्षिण व मध्य गुजरातला प्रतिनिधित्व देण्यात आले. नरोडा येथील आमदार निर्मला वधवानी या मंत्रिमंडळात एकमेव महिला सदस्य आहेत. मंत्रिमंडळात ८ कॅबिनेट, तर १६ राज्यमंत्री आहेत. उ महात्मा मंदिर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याला भाजपाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री हर्ष वर्धन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आनंदीबेन पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वृत्तसंस्था)या मंत्र्यांना वगळले : आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात असलेले रजनीभाई पटेल, वसुबेन त्रिवेदी, सौरभ पटेल, गोविंद पटेल, छत्रसिंह मोरी, ताराचंद छेडा आणि कांतीभाई गमीत यांना वगळण्यात आले आहे. ३ आॅगस्ट रोजी आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिला होता. ८ कॅबिनेट मंत्री : नितीन पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, गणपत वसवा, बाबू बोखिरिया, दिलीप ठाकूर, जयश रादादिया, चिमण सपारिया आणि आत्मराम परमार.