शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अफवांनी आगीत ओतले तेल, ‘ती’ घटनाही यामुळेच; विविध सुरक्षा यंत्रणांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 08:51 IST

मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

इम्फाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात अफवा आणि खोट्या बातम्यांचा मोठा वाटा होता, असे मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या विविध सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याच्या प्रकारापूर्वी आदिवासींनी पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करून पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाचे छायाचित्र इम्फाळ खोऱ्यात प्रसारित झाल्यानंतर हिंसाचार भडकला. नंतर हे चित्र नवी दिल्लीतील एका महिलेच्या हत्येचे असल्याचे आढळून आले; परंतु तोपर्यंत हिंसाचाराने खोऱ्याला वेढले होते. नंतर दुसऱ्या दिवशी ती लज्जास्पद घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच दिवशी जेमतेम ३० किमी अंतरावर २० वर्षांच्या आणखी दोन तरुणींवर क्रूरपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली.

बनावट चित्रामुळे अराजकता आगीसारखी पसरली. सरकारने इंटरनेट बंद करण्याचे हे एक कारण आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत असे समजू या; परंतु मणिपूरमधील सततचा हिंसाचार कसा माफ करता येईल?  मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील परिस्थितीशी तुलना कशी करता येईल? 

- पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन रखडले आहे. विरोधी पक्षांना हात जोडून विनंती की, या विषयावरील चर्चेत सामील व्हावे.  ईशान्येकडील राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण करू नये.- अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री

आणखी २ मुलींवर ‘गॅंगरेप’

मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड प्रकरण झाले त्याच दिवशी मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात घडली. दोन्ही तरुणी गॅरेजमध्ये काम करायच्या. 

त्या दिवशी हल्लेखोरांमध्ये महिलाही होत्या. महिलांनीच गर्दीत उपस्थित पुरुषांना बलात्कार करण्यास सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेत १००-२०० लोक उपस्थित असल्याचा उल्लेख आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार