शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

अफवांनी आगीत ओतले तेल, ‘ती’ घटनाही यामुळेच; विविध सुरक्षा यंत्रणांचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 08:51 IST

मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

इम्फाळ : मणिपूरमध्ये ३ मे रोजी उसळलेल्या वांशिक हिंसाचारात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात अफवा आणि खोट्या बातम्यांचा मोठा वाटा होता, असे मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असलेल्या विविध सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याच्या प्रकारापूर्वी आदिवासींनी पीडितेची हत्या केल्याचा खोटा दावा करून पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाचे छायाचित्र इम्फाळ खोऱ्यात प्रसारित झाल्यानंतर हिंसाचार भडकला. नंतर हे चित्र नवी दिल्लीतील एका महिलेच्या हत्येचे असल्याचे आढळून आले; परंतु तोपर्यंत हिंसाचाराने खोऱ्याला वेढले होते. नंतर दुसऱ्या दिवशी ती लज्जास्पद घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्याच दिवशी जेमतेम ३० किमी अंतरावर २० वर्षांच्या आणखी दोन तरुणींवर क्रूरपणे बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली.

बनावट चित्रामुळे अराजकता आगीसारखी पसरली. सरकारने इंटरनेट बंद करण्याचे हे एक कारण आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांवरील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत असे समजू या; परंतु मणिपूरमधील सततचा हिंसाचार कसा माफ करता येईल?  मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील परिस्थितीशी तुलना कशी करता येईल? 

- पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन रखडले आहे. विरोधी पक्षांना हात जोडून विनंती की, या विषयावरील चर्चेत सामील व्हावे.  ईशान्येकडील राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण करू नये.- अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री

आणखी २ मुलींवर ‘गॅंगरेप’

मणिपूरमध्ये विवस्त्र धिंड प्रकरण झाले त्याच दिवशी मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात घडली. दोन्ही तरुणी गॅरेजमध्ये काम करायच्या. 

त्या दिवशी हल्लेखोरांमध्ये महिलाही होत्या. महिलांनीच गर्दीत उपस्थित पुरुषांना बलात्कार करण्यास सांगितले. एफआयआरनुसार, दोन्ही मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेत १००-२०० लोक उपस्थित असल्याचा उल्लेख आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार