शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

“फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 11:03 IST

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांसंदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत आहे. यानंतर त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. यातच आता मोहन भागवत यांनी देशाच्या फाळणीवरून पुन्हा एकदा एक वक्तव्य केले आहे. फाळणीवेळी भारताला जे भोगावे लागले आहे, भारताने जे सोसले आहे, ते कधी विसरता येणार नाही, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नोएडा येथे कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमावेळी मोहन भागवत यांनी फाळणीवेळच्या कटू स्मृतींना उजाळा दिला. आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवे. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी सक्षम व्हायला हवे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे

हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामे करण्यासाठी सक्षम व्हायला हवे. भारताने फाळणीच्या काळात जे सोसले आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळे पूर्वीसारखे होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असे मानणारी ही विचारधारा नाही. मात्र, इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की, फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचे, लढाईचं मूळ हेच होते, असेही मोहन भागवत यांनी सांगितले. 

एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही

या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही, असेही भागवत म्हणाले. यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केलेली नाही. कारण आपण प्रगतीचा जो मार्ग निवडला तो योग्य नव्हता. भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून आपली मातृभूमी मानली आहे. भारताची प्रगती कोणीच रोखू शकत नाही, असे मोहन भागवत यांनी सांगितले होते. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत