शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:20 IST

RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांचा मणिपूर दौरा कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

RSS Chief Mohan Bhagwat Manipur Visit: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसीय मणिपूर दौऱ्यावर जात आहे. मणिपूर येथे दोन वर्षांपूर्वी घडलेल्या जातीय हिंसाचारानंतर प्रथमच मोहन भागवत यांचा हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर असे तीन दिवस मोहन भागवत मणिपूरमध्ये असणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांचा हा दौरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या शताब्दी सोहळ्याशी निगडीत आहे. मोहन भागवत २० नोव्हेंबर रोजी गुवाहाटीहून मणिपूरला जाणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी ते मणिपूर येथून प्रस्थान करतील. राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून मणिपूरला हा त्यांचा पहिलाच दौरा असल्याचे संघाचे पदाधिकारी तरुणकुमार शर्मा यांनी सांगितले. यापूर्वी मोहन भागवत यांनी २०२२ मध्ये मणिपूरला भेट दिली होती.

मणिपूर दौऱ्यात मोहन भागवत कुणाला भेटणार?

या दौऱ्यादरम्यान मोहन भागवत विविध गटांशी संवाद साधतील. आरएसएस प्रमुखांच्या कार्यक्रमात काही नागरिक, स्थानिक आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी आणि युवा नेते यांचा समावेश असेल. तरुण कुमार शर्मा म्हणाले की, ज्या दिवशी मोहन भागवत मणिपूरला पोहोचतील त्या दिवशी ते इंफाळमधील कोंजेंग लीकाई येथे एका कार्यक्रमात उद्योजक आणि प्रमुख लोकांना भेटतील. यानंतर, २१ नोव्हेंबर रोजी मोहन भागवत मणिपूरच्या आदिवासी समाजाच्या नेत्यांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील.

विस्थापितांच्या मदत छावण्यांना मोहन भागवत भेट देणार का?

गेल्या दोन वर्षांपासून विस्थापित लोक राहत असलेल्या मदत छावण्यांनाही संघ प्रमुख भेट देतील का असे विचारले असता, संघाचे राज्य सरचिटणीस तरुण कुमार शर्मा म्हणाले की, अद्याप अशी कोणतीही योजना नाही. हा दौरा प्रामुख्याने संघटनेचा अंतर्गत कार्यक्रम आहे. २०२३ पासून मणिपूरमध्ये मेतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारात २६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि हजारो बेघर झाले आहेत.

दरम्यान, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. ज्या व्यक्तीला भारताचा अभिमान वाटतो, ती प्रत्येक व्यक्ती हिंदूच आहे. हिंदू धर्माची ओळख केवळ धार्मिक नसून ती एक सभ्यतेची ओळख आहे. भारत आणि हिंदू एकच आहेत. भारत मूळतः 'हिंदू राष्ट्र'च आहे. त्यामुळे भारताला 'हिंदू राष्ट्र' होण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : RSS Chief Mohan Bhagwat to Visit Manipur After Violence

Web Summary : Mohan Bhagwat will visit Manipur for three days, his first trip since the ethnic violence. He will meet with community leaders, tribal representatives, and entrepreneurs during his visit. The visit is linked to RSS centenary celebrations.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतManipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliticsराजकारण