शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:07 IST

RSS Chief Mohan Bhagwat: 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. अयोध्येची पुनर्बांधणी देशाची आजची गरज.'

Ram Mandir: अयोध्येत उभारलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहला उद्या, म्हणजेच 22 जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील जनतेला एक महत्वाचे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला अनावश्यक वाद संपवला पाहिजे. समाजांमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्याची वेळ आली आहे. अयोध्या (Ayodhya) संघर्षमुक्त ठिकाण म्हणून ओळखले जावे असे त्यांनी म्हटले आहे.

भारताचा इतिहास संघर्षांनी भरलेलाएका लेखात आरएसएस प्रमुख म्हणाले, 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. लुटीसाठी भारतावर अनेक हल्ले झाले, पण इस्लामच्या नावावर पाश्चिमात्यांकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे समाजाचा संपूर्ण विनाश आणि अलिप्तता आली. देश आणि समाजाचे मनोधैर्य खचण्यासाठी धार्मिक स्थळे नष्ट करणे आवश्यक होते, म्हणून परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरे नष्ट केली.' 

परकीयांचे मंदिरांवरील हल्ले...'अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील हल्ला याच उद्देशाने करण्यात आला होता. भारतावर हल्ला झाला तरी तेथील राज्यकर्त्यांनी कधीही परकीय भूमीवर आक्रमण केले नाही. मंदिरांवरील हल्ल्यांनंतरही भारतातील समाजाची श्रद्धा, निष्ठा आणि मनोधैर्य कधीच कमी झाले नाही. प्रतिकार संघर्ष सुरूच होता. या कारणास्तव श्रीराम जन्मभूमी पुन्हा-पुन्हा ताब्यात घेऊन तेथे मंदिर उभारण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू झाले आणि मंदिराचा मुद्दा हिंदूंच्या मनात कायम राहिला.'

समाजातील कटुता संपली पाहिजे'धार्मिक दृष्टिकोनातून श्रीराम हे बहुसंख्य समाजाचे पूजनीय देव आहेत आणि श्री रामचंद्रांचे जीवन संपूर्ण समाजाने स्वीकारले आहे. त्यामुळे आता विनाकारण निर्माण झालेला वाद आणि कटुता संपली पाहिजे. हा वाद पूर्णपणे संपावा, हे समाजातील प्रबुद्ध लोकांनी पहावे. अयोध्या म्हणजे, जेथे युद्ध नाही, विवादमुक्त ठिकाण, असे शहर ते आहे. त्यामुळे अयोध्येची पुनर्बांधणी ही संपूर्ण देशाची आजची गरज आहे आणि ते आपल्या सर्वांचे कर्तव्यही आहे,' अशा भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या