शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

'कटुता संपवून पुढे जाण्याची वेळ, अयोध्या...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:07 IST

RSS Chief Mohan Bhagwat: 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. अयोध्येची पुनर्बांधणी देशाची आजची गरज.'

Ram Mandir: अयोध्येत उभारलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहला उद्या, म्हणजेच 22 जानेवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील जनतेला एक महत्वाचे आवाहन केले आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला अनावश्यक वाद संपवला पाहिजे. समाजांमध्ये निर्माण झालेली कटुता संपवण्याची वेळ आली आहे. अयोध्या (Ayodhya) संघर्षमुक्त ठिकाण म्हणून ओळखले जावे असे त्यांनी म्हटले आहे.

भारताचा इतिहास संघर्षांनी भरलेलाएका लेखात आरएसएस प्रमुख म्हणाले, 'भारताचा गेल्या दीड हजार वर्षांचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे. लुटीसाठी भारतावर अनेक हल्ले झाले, पण इस्लामच्या नावावर पाश्चिमात्यांकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे समाजाचा संपूर्ण विनाश आणि अलिप्तता आली. देश आणि समाजाचे मनोधैर्य खचण्यासाठी धार्मिक स्थळे नष्ट करणे आवश्यक होते, म्हणून परकीय आक्रमकांनी भारतातील हजारो मंदिरे नष्ट केली.' 

परकीयांचे मंदिरांवरील हल्ले...'अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील हल्ला याच उद्देशाने करण्यात आला होता. भारतावर हल्ला झाला तरी तेथील राज्यकर्त्यांनी कधीही परकीय भूमीवर आक्रमण केले नाही. मंदिरांवरील हल्ल्यांनंतरही भारतातील समाजाची श्रद्धा, निष्ठा आणि मनोधैर्य कधीच कमी झाले नाही. प्रतिकार संघर्ष सुरूच होता. या कारणास्तव श्रीराम जन्मभूमी पुन्हा-पुन्हा ताब्यात घेऊन तेथे मंदिर उभारण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू झाले आणि मंदिराचा मुद्दा हिंदूंच्या मनात कायम राहिला.'

समाजातील कटुता संपली पाहिजे'धार्मिक दृष्टिकोनातून श्रीराम हे बहुसंख्य समाजाचे पूजनीय देव आहेत आणि श्री रामचंद्रांचे जीवन संपूर्ण समाजाने स्वीकारले आहे. त्यामुळे आता विनाकारण निर्माण झालेला वाद आणि कटुता संपली पाहिजे. हा वाद पूर्णपणे संपावा, हे समाजातील प्रबुद्ध लोकांनी पहावे. अयोध्या म्हणजे, जेथे युद्ध नाही, विवादमुक्त ठिकाण, असे शहर ते आहे. त्यामुळे अयोध्येची पुनर्बांधणी ही संपूर्ण देशाची आजची गरज आहे आणि ते आपल्या सर्वांचे कर्तव्यही आहे,' अशा भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या