शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:47 IST

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे."

बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी चिंता व्यक्त करत, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. जर चर्चेतून समाधान निघू शकत नसेल, तर केंद्राने दुसऱ्यावर विचार करायला हवा, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.

नागपुरात आयोजीत एका 'सकल हिंदू समाजाच्या' वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बोलताना आंबेकर म्हणाले, "या प्रकरणाकडे केंद्राने अधिक गांभीर्याने बघायहा हवे आणि ठोस पावले उचलायला हवीत. मला आशा आहे की, या मुद्द्यावर संवादातून मार्ग निघेल. मात्र, चर्चा अयशस्वी ठरली तर, आपल्याला यावर दुसरे सामाधान शोधावे लागेल."

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार मुघल काळाची आठवण करून देणारे आहेत. तेथे आमची मंदिरे जाळली जात आहेत. लुटली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व पाहून प्रत्येक हिंदूला संताप यायला हवा. या घटनांची केवळ निंदा करणेच पुरेसे नाही, तर राग आणि दुःखातून बाहेर येत, पुढे जाणे आवश्यक आहे."

आंबेकर पुढे म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर पाकिस्तानातही हिंदूंवर हल्ले होत आहेत. आम्ही हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही. जर आपण यावर काहीच केले नाही, तर आपल्या भावी पिढ्या आपल्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित करतील."

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनुस यांच्यावर निशाणा साधताना आंबेकर म्हणाले, "ज्या देशाचे नेतृत्व नोबेल शांती पुरस्कार विजेते करत आहेत, तेथे शांतता होऊ शकत नाही. ते तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी काहीही करताना दिसत नाहीत." 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBangladeshबांगलादेशHinduहिंदूCentral Governmentकेंद्र सरकार