शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:47 IST

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे."

बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी चिंता व्यक्त करत, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. जर चर्चेतून समाधान निघू शकत नसेल, तर केंद्राने दुसऱ्यावर विचार करायला हवा, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.

नागपुरात आयोजीत एका 'सकल हिंदू समाजाच्या' वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बोलताना आंबेकर म्हणाले, "या प्रकरणाकडे केंद्राने अधिक गांभीर्याने बघायहा हवे आणि ठोस पावले उचलायला हवीत. मला आशा आहे की, या मुद्द्यावर संवादातून मार्ग निघेल. मात्र, चर्चा अयशस्वी ठरली तर, आपल्याला यावर दुसरे सामाधान शोधावे लागेल."

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार मुघल काळाची आठवण करून देणारे आहेत. तेथे आमची मंदिरे जाळली जात आहेत. लुटली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व पाहून प्रत्येक हिंदूला संताप यायला हवा. या घटनांची केवळ निंदा करणेच पुरेसे नाही, तर राग आणि दुःखातून बाहेर येत, पुढे जाणे आवश्यक आहे."

आंबेकर पुढे म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर पाकिस्तानातही हिंदूंवर हल्ले होत आहेत. आम्ही हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही. जर आपण यावर काहीच केले नाही, तर आपल्या भावी पिढ्या आपल्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित करतील."

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनुस यांच्यावर निशाणा साधताना आंबेकर म्हणाले, "ज्या देशाचे नेतृत्व नोबेल शांती पुरस्कार विजेते करत आहेत, तेथे शांतता होऊ शकत नाही. ते तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी काहीही करताना दिसत नाहीत." 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBangladeshबांगलादेशHinduहिंदूCentral Governmentकेंद्र सरकार