शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"बांगलादेश ऐकत नसेल तर हिंदूंच्या रक्षणासाठी...!" RSS चं मोदी सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:47 IST

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे."

बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचार सातत्याने वाढताना दिसत आहेत. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी चिंता व्यक्त करत, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, असे आवाहन केले आहे. जर चर्चेतून समाधान निघू शकत नसेल, तर केंद्राने दुसऱ्यावर विचार करायला हवा, असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.

नागपुरात आयोजीत एका 'सकल हिंदू समाजाच्या' वतीने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना बोलताना आंबेकर म्हणाले, "या प्रकरणाकडे केंद्राने अधिक गांभीर्याने बघायहा हवे आणि ठोस पावले उचलायला हवीत. मला आशा आहे की, या मुद्द्यावर संवादातून मार्ग निघेल. मात्र, चर्चा अयशस्वी ठरली तर, आपल्याला यावर दुसरे सामाधान शोधावे लागेल."

आंबेकर म्हणाले, "बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार मुघल काळाची आठवण करून देणारे आहेत. तेथे आमची मंदिरे जाळली जात आहेत. लुटली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व पाहून प्रत्येक हिंदूला संताप यायला हवा. या घटनांची केवळ निंदा करणेच पुरेसे नाही, तर राग आणि दुःखातून बाहेर येत, पुढे जाणे आवश्यक आहे."

आंबेकर पुढे म्हणाले, "बांगलादेशात होत असलेल्या हिंसाचाराचा उद्देश तेथून हिंदू समाज उखडून टाकणे आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर पाकिस्तानातही हिंदूंवर हल्ले होत आहेत. आम्ही हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही. जर आपण यावर काहीच केले नाही, तर आपल्या भावी पिढ्या आपल्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित करतील."

बांगलादेशचे अंतरिम नेते मुहम्मद युनुस यांच्यावर निशाणा साधताना आंबेकर म्हणाले, "ज्या देशाचे नेतृत्व नोबेल शांती पुरस्कार विजेते करत आहेत, तेथे शांतता होऊ शकत नाही. ते तेथे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी काहीही करताना दिसत नाहीत." 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBangladeshबांगलादेशHinduहिंदूCentral Governmentकेंद्र सरकार